शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

३१ मे पर्यंत दुष्काळी अनुदान वाटपाची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : राज्य सरकारने खरीप २०१८ मध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ३२० कोटीेंचे अनुदान मंजूर केले होते. ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारने खरीप २०१८ मध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ३२० कोटीेंचे अनुदान मंजूर केले होते. कमी पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आल्याने शेतकऱ्यांना मदत म्हणून हे अुनदान वर्ग केले होते. संबंधित अनुदान शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी बँकांना दिले होते. मात्र, त्यातील बहुतांश अनुदान अद्यापही शेतक-यांच्या खात्यात जमा झाले नसल्याचे दिसून आले. शिल्लक अनुदान ३१ मे पूर्वी शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश सोमवारी बँक अधिका-यांच्या आढावा बैठकीत दिले.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनववडे, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक इलमकर यांच्यासह राष्ट्रीय तसेच खासगी बँकांचे व्यवस्थापक हजर होते. यावेळी जिल्हाधिका-यांनी अत्यंत कडक भूमिका घेत, व्यवस्थांपकांना खडसावले. अनुदान वाटपामध्ये मोठा गोंधळ असल्याचे दिसून आले. हे अनुदान शेतक-यांच्यासाठी मदत म्हणून राज्य सरकारने जिल्ह्याला दिले होते. परंतु त्याचे वाटप नेमके कोणत्या कारणांमुळे रखडले, याची समाधानकारक उत्तरे अधिका-यांना देता आले नाहीत, त्यातच राष्ट्रीयकृत बँकांनी तर पीककर्ज वाटपासह अनुदान वाटपातही चलता है ची भूमिका घेतल्याने बिनवडे हे जाम चिडले होते. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.जालना जिल्ह्यात यंदा तीव्र दुष्काळ पडला आहे. त्याचा परिणाम म्हणून शेतकरी आर्थिक संकटात आहेत, ही बाब लक्षात घेऊन आगामी काळातील पीककर्ज वाटपासाठी आतापासून नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही पीककर्ज वाटपासाठी बँक, महसूल आणि सहकार या विभागांनी तालुका पातळीवर मेळावे घेऊन पीक वाटपाची गती वाढवावी. दर आठवड्यात किमान दहा टक्के पीककर्ज आतापासून वाटप करण्याचे उद्दिष्ट यावेळी देण्यात आले. या बैठकीस जिल्हा सहकार निबंधक नारायण आघाव तसेच अन्य बँक व्यवस्थापकांची उपस्थिती होती.मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांबद्दल नाराजीचा सूरजालना जिल्हा मध्यवर्ती बँके प्रमाणे अन्य राष्ट्रीयीकृत बँकांनी पीककर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट गेल्या वर्षी पूर्ण केले नव्हते. कर्जाचे पुनर्गठन करण्याकडेही बँकांनी पाठ फिरवली होती. या मुद्यावरून जिल्हाधिकारी बिनवडे यांनी मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापनावर तीव्र नाराजी व्यक्त करून आगामी खरीप आणि रबी हंगामात पीककर्ज वाटपात सुधारणा करण्याचेही आदेश दिले.अनुदानातून वसुली नकोजालना जिल्ह्यात ३२० कोटी रूपयांचे अनुदान मिळालेले आहे. हे अनुदान शेतक-यांच्या खात्यात जमा करताना अनेक बँका या कर्जाचे हप्ते त्यातून कापून घेत असल्याचे दिसून येते. ते त्वरित थांबविण्यासह सक्तीची कर्ज वसूली न करण्याचेही निर्देश या बैठकीत देण्यात आले. बँकेच्या व्यवस्थापकांनी अपु-या मनुष्यबळाचा मुद्दा जिल्हाधिका-यांच्या कानावर घातला. मात्र, या मुद्यावरून कामे न थांबविण्याचेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :droughtदुष्काळJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना