शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांचे प्रमाण घटल्याने शेवग्याला शेंगा लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST

शेषराव वायाळ परतूर - शेवगा या पिकाच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे यंदा शेवगा पिकाला ...

शेषराव वायाळ

परतूर - शेवगा या पिकाच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे यंदा शेवगा पिकाला शेंगा लागत नाही. परिणामी, उत्पादक शेतकरी चिंतेत असून, कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

परतूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून शेवगा लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेवगा या पिकाला कमी प्रमाणात पाणी लागते. तसेच आठ ते नऊ महिन्यात उत्पादन सुरू होते. त्यातच या पिकाला बाजारात मोठी मागणी देखील आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी मुख्य पीक म्हणून शेवगा लागवड करतात. शेवगा पिकाच्या परागीकरणासाठी मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. शेवगा हे पीक स्व परागीकरण करू शकत नसल्याने फुलास परागीकरणावर अवलंबून रहावे लागते. फुलातील मकरंद घेण्यासाठी मधमाशा या फुलावरून त्या फुलावर जातात. त्यांच्या पायाला परागकण चिकटून फलन होते व त्याचे रूपांतर फळात म्हणजे शेंगात होण्यास मदत होते. परंतु, यंदा मधमाशांचे प्रमाण घटल्याने शेवगा पिकाला शेंगा येत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण असून, कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चौकट

शेवगा परागीकरणात मधमाशांची महत्त्वाची भूमिका आहे. यावर्षी वातावरणातील बदल व इतर कारणांनी मधमाशांंचे प्रमाण कमी झाले आहे. शेवगा या पिकाला पाणी कमी लागते, ढगाळ वातावरणात फुलगळ होते. शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन केल्यास या संकटावर मात करता येते. मधमाशांना आकर्षित करण्यासाठी गुळात गोणपाटाचे तुकडे भिजवून शेवग्याच्या शेतात योग्य ठिकाणी अडकवून ठेवल्यास याचा चांगला फायदा होतो.

रूस्तुम बोनगे, कृषी अधिकारी,परतूर

===Photopath===

020321\02jan_7_02032021_15.jpg

===Caption===

परतूर येथील एका शेतातील शेवगा पिकाला शेंगा लागत नसल्याचे दिसून आले.