शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या नियोजनाअभावी जालनेकरांवर जलसंकट..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:07 IST

रविवारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून जनतेचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला. हे उपोषण हुतात्मा जनार्दन मामा चौकामध्ये करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील पाणीटंचाई ही ज्यांच्या हातात पालिकेचे सूत्र आहेत त्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झाली आहे. यापूर्वी पालिकेच्या झालेल्या सभांमधून आम्ही प्रशासन तसेच काँग्रेसच्या नेत्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतील त्यासाठी आतापासूनच नियोजन करा, अशी मागणी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज जालनेकरांवर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद झाले आहे.रविवारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून जनतेचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला. हे उपोषण हुतात्मा जनार्दन मामा चौकामध्ये करण्यात आले. यावेळी जालना पालिकेचे उपाध्यक्ष तथा नव्याने भाजपमध्ये दाखल झालेले राजेश राऊत, नगरसेवक भास्कर दानवे, अशोक पांगारकर, सतिश जाधव, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, नगरसेवक राठी, संध्या देठे, शशिकांत घुगे, चंपालाल भगत, गेंदालाल झुंगे, विशाल बनकर, शहराध्यक्ष सिद्धीविनायक मुळे आदींची यावेळी उपस्थिती होती.पत्रकारांशी बोलताना भास्कर दानवे म्हणाले की, खा. रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील पाणीटंचाईवर तातडीचा उपाय म्हणून ६१ टँकर सुरू करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या समवेत बैठक घेऊन ते सुरू करण्या संदर्भात सुचना केल्या होत्या. हे टँकर इंदेवाडी येथील जलकुंभातुन भरण्यात येणार आहे. यासाठी जास्तीचा वेळ खर्च होईल असा आरोप माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. मात्र, त्यात तथ्य नसून, आम्ही पाणी भरण्यासाठीचा जास्त क्षमतेच्या विद्युत मोटारींचा वापर टँकर भरण्यासाठी करणार आहोत. यासाठी केवळ एक ते दीड एमएलडी पाणी लागणार आहे. त्यातही हे पाणी अंबड येथून शुद्ध होऊन आल्याने ते थेट जालनेकरांना पिण्यासाठी वापरता येणार आहे. परंतु, यातही राजकारण आणण्याचा गोरंट्याल यांचा प्रयत्न चुकीचा असल्याचा आरोप दानवे यांनी केला.हे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण मागे घ्यावे म्हणून, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी उपोषणस्थळी भेट देवून आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.कामे अर्धवट असताना बिले अदा !यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत आणि अशोक पांगारकर यांनी सांगितले की, ज्या एजन्सीकडून अंतर्गत जलवाहिनीचे काम सुरू आहे. त्याचे जवळपास ९६ कोटी रूपयांचे बिल कामे अर्धवट असतांना अदा केले आहेत. या मागे नेमका कुठला उद्देश आहे हा संशोधनाचा विषय होवू शकतो.जोपर्यंत काम समाधानकारक होत नाही, तोपर्यंत बील देऊ नये असे लेखी पत्र मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र त्या पत्राला केराची टोपली दाखवून कंत्राटदाराचे हित जपण्याचे प्रयत्न प्रशासन आणि पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदBJPभाजपाagitationआंदोलनWaterपाणी