शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी मजूर देता का मजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST

जालना : मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी वातावरणात झालेल्या बदलामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांवर रोगराई पडली आहे. यावर ...

जालना : मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी वातावरणात झालेल्या बदलामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांवर रोगराई पडली आहे. यावर फवारणी करण्यासह इतर कामांसाठी अंबड तालुक्यातील रोहिलागड, खेडगाव, निहालसिंगवाडी, चिकनगाव परिसरात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. हेच चित्र मंठा तालुक्यातही असल्याचे दिसून आले.

मागील तीन ते चार वर्षात गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने शेतकऱ्यांची आशा रबी पिकांवर होती. सध्या अनेक गावांमध्ये रबी पिकेही चांगली आली आहेत; परंतु अनेक गावांमध्ये तूर काढणीसह मोसंबी आळ्यांची टाचणी करणे, गहू पिकाला पाणी देणे, डाळिंब छाटणी करून बागेतील कचरा जमा करण्याचे काम सुरू आहे. यातच काही गावांमधील मजूर ऊसतोडणीसाठी गेले आहेत. असे असतानाच यंदा रबी पिकांचा पेराही गावोगाव वाढला आहे. त्यामुळे अंबड तालुक्यातील किनगाव, कवचलवाडी यांसह इतर काही गावांमध्ये मागणीच्या तुलनेत मजुरांची टंचाई जाणवत आहे.

काय म्हणतात गावोगावचे शेतकरी

रोहिलागड परिसरातील काही मजूर शेंद्रा एमआयडीसीमध्ये कामावर जातात. याचा परिणाम गावात मजूर मिळण्यावर होत आहे. मजूरांकडून करून घेणारी कामे घरीच कुटुंबीयातील सदस्यांकडून करून घेतली जातात, अशी माहिती रोहिलागड येथील कल्याण टकले यांनी दिली.

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात खरीप हंगामातील कापूस वेचणीसाठी मजुरांची अधिक टंचाई जाणवते. अशा वेळी आम्ही विदर्भातून मजुरांची कापूस वेचणीसाठी ने-आण करतो, इतर वेळी मजुरांची टंचाई जाणवत नाही, अशी माहिती टेंभुर्णी येथील शेतकरी संतोष शिंदे दिली आहे.

शेतीतील कामे अंगमेहनतीची असतात. त्यामुळे काही प्रमाणात मजूर शेतीची कामे करण्याकडे दुर्लक्ष करतात. आमच्या गावात सध्या गहू, हरभरा खुरपणीची कामे सुरू आहेत. ही कामे गाव परिसरात सुरू असल्याने मजुरांची सद्यस्थितीत टंचाई जाणवत आहे, अशी माहिती बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथील अचितराव देशमुख यांनी दिली.

यंत्राने होणारी कामे

पूर्वी होणाऱ्या बैलशेतीचा उपयोग आता ट्रॅक्टर शेतीत झाला आहे. यासोबतच फळपिकांवर फवारणी यंत्राच्या सहाय्याने केली जात आहे.

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा

लागवड केलेल्या उसाची सरी फोडण्यासाठी छोट्या ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. खुरपणीसाठी मजूर वेळेवर न मिळाल्यास औषधांची फवारणी करून गवत जाळले जाते, तसेच अनेक गावांमध्ये पिकांना ठिबकद्वारे पाणी दिले जात आहे. एकूणच कृषी यंत्रामुळे अंगमेहनतीची कामे आता राहिली नाहीत.