शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जालन्यात ७ जणांवर हद्दपारीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:23 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असलेल्या ५४ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस दलाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले होते. पैकी ७ जणांना हद्दपार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनिवडणूक पार्श्वभूमीवर ५४ प्रस्ताव : अन्य ४० जणांची माहिती पोलीस ठाण्यांकडे सादर

जालना : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असलेल्या ५४ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस दलाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले होते. पैकी ७ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून इतर सराईत ४० गुन्हेगारांची माहिती संकलित करून ठाण्याच्या प्रभारींना देण्यात आले आहेत. संबंधितांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.लोकसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया जिल्हा पोलीस दलाने विधानसभा निवडणुकीसाठीही तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी चेकपोस्ट, नाकाबंदी करण्यात येत आहे. वाहनांची तपासणी केली जात असल्याने अवैध धंद्यांनाही लगाम लागला आहे. याचबरोबर कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असलेल्या ५४ जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले होते.यात कलम ५५ मपोका नुसार तिघांना हद्दपार करण्यात आले आहे. कलम ५६ मपोका नुसार ३० जणांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यातील ९ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. तर १७ प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांकडे प्रलंबीत आहेत. कलम ५७ मपोका नुसार २१ जणांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यातील एकाला हद्दपार करण्यात आले असून, २० प्रकरणे प्रलंबीत आहेत.पाठविलेल्या ५४ प्रकरणांपैकी इतर सराईत गुन्हेगारांचा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून तपासण्यात आला होता. त्यानुसार ४० जणांची माहिती संकलित करून पोलीस ठाण्यांकडे पाठविण्यात आली आहे. संबंधितांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना ठाणे प्रभारींना देण्यात आली आहे. याशिवाय विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाईचे सत्रही हाती घेतले आहे.इशारा : कायदे मोडणाºयांवर कारवाई

विधानसभा निवडणुकीतील आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस दलाच्या वतीने आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.- एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी