शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

जालन्याचे पाणी चोरणाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:01 IST

जालनेकर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करत आहेत, असे असताना पैठण ते पाचोड दरम्यानचे काही पाणीचोर मात्र, या जालन्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारून दररोज ७० लाख लिटर पाण्याची चोरी करत असल्याचे पाहीनीतून उघड झाले आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्षा संगीता गोरंट्याल : १२ जणांवर पाणी चोरीचे गुन्हे

जालना : जालनेकर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करत आहेत, असे असताना पैठण ते पाचोड दरम्यानचे काही पाणीचोर मात्र, या जालन्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारून दररोज ७० लाख लिटर पाण्याची चोरी करत असल्याचे पाहीनीतून उघड झाले आहे. पाणीचोरी करणाऱ्यांवर आता हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करावी अशी मागणी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.गेल्या काही वर्षापासून हा पाणी चोरांचा गोरखधंदा सुरू होता. त्यावर नियंत्रणासाठी २४ जानेवारीला देखील अशीच अचानक पाहणी पालिकेच्या पथकाने केली होती. त्यावेळी आठ शेतकºयांनी व्हॉल्व मधून पाण्याची चोरी करून शेततळी तसेच स्वत:च्या विहिरीत ते पाणी साठवून नंतर त्यांची विक्री करण्याचा धंदा त्यांनी चालविला होता.दरम्यान जालना पालिकेने जिल्हाधिकाºयांच्या कानावर ही बाब घातल्यावर त्यांनी लगेचच आयुक्तांना ही माहिती दिली. त्यानुसार गुरूवारी अचानक पाहणी केली असता, मोठी धक्कादायक बाब समोर आली. ज्या आठ शेतकºयांवर यापूर्वीच पाचोड ठाण्यात गुन्हे दाखल होते, त्यांनी त्यांचा पाणी चोरीचा धंदा सुरूच ठेवल्याचे उघड होऊन आणखी चार शेतकºयांची त्यात भर पडली.या बारा जणांविरूध्द आता पाचोड पोलिस ठाण्यात पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बगळे यांच्या तक्रारीवरून अजामिनपात्र गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.गुरूवारी केलेल्या पाहणीच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. यावेळी पैठणचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, पैठणचे तहसीलदार महेश सावंत, पाचोडचे पोलीस निरीक्षक मोरे, पाणीपुरवठा सभापती रमेश गोरक्षक, नगर अभियंता राजेश बगळे, संजय राजाळे, विनोद चव्हाण यांच्यासह २० पोलीस कर्मचाºयांची उपस्थिती होती.पत्रकार परिषदेस माजी आ. कैलास गोरंट्याल, सभापती रमेश गौरक्षक, नगरसेवक शाह आलम खान, विजय चौधरी, महावीर ढक्का, विनोद यादव, गणेश चौधरी आदींची उपस्थिती होती.हे आहेत पाणीचोरपैठण ते जालना दरम्यान असलेल्या पाईपालाईनच्या व्हॉल्व मधून पाण्याची चोरी करणाºयांमध्ये अशोक निर्मल, बबन कर्डिले (लिंबगाव), अप्पासाहेब रामराव शेरकर, श्रीमंत भानुदास लबडे, सोमनाथ अण्णासाहेब निर्मल, एकनाथ रंगनाथ कोल्हे, अनिल भगिरथ भवरे, संतोष आगळे, घायाळ, तळवे, हजारे (पाचोड) यांचा समावेश आहे.या १२ जणांपैकी पहिले एक ते सात जणांवर यापूर्वी पाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी व्हॉल्व फोडून जवळपास पाईपालाईनचे ३९ लाख रूपयांचे नुकसान केले आहे.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदWaterपाणीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी