शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

राजूर परिसरातील दोन प्रकल्पांना संरक्षणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 12:23 AM

राजूरसह परिसरातील पंधरा गावांची तहान भागविणाऱ्या बाणेगाव आणि चांधई एक्को मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, अज्ञात व्यक्तींकडून वारंवार खोडसाळपणा करून प्रकल्पाचे गेट उघडण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : राजूरसह परिसरातील पंधरा गावांची तहान भागविणाऱ्या बाणेगाव आणि चांधई एक्को मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, अज्ञात व्यक्तींकडून वारंवार खोडसाळपणा करून प्रकल्पाचे गेट उघडण्यात येत आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याने दोन्ही प्रकल्पांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांधून होत आहे.भोकरदन तालुक्यातील बाणेगाव आणि चांधई एक्को मध्यम प्रकल्पातून राजूरसह पंचक्रोशितील पंधरा गावांची तहान भागवली जाते. दोन्ही प्रकल्पाच्या परिसरातील शेतकरी बुडीत क्षेत्रात खरीप पिकांची लागवड करतात. प्रकल्प पाण्याने तुडूंब भरण्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर पिकाला अडचण निर्माण होवू नये, म्हणून काही अज्ञात व्यक्ती खोडसाळपणा करून प्रकल्पातील पाण्याला वाट मोकळी करून देतात. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. गेल्या तीन वर्षांपासून चांधई एक्को मध्यम प्रकल्प तुडूंब भरल्यानंतर अज्ञात व्यक्तीने प्रकल्पाच्या मध्यभागी छिद्र पाडून पाण्याला वाट मोकळी करून दिली होती.लघूपाटबंधारे विभागाचे प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याने माथेफिरूंचे फावत आहे. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. दोन्ही प्रकल्पात जलसाठा न झाल्यास परिसरातील पंधरा गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते, यावर्षी पावसाळ््यात एकही पाऊस न झाल्याने दोन्ही प्रकल्प कोरडेठाक होते. मात्र, परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.२९ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री बाणेगाव मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे साखळी, कुलूप तोडून दरवाजे खुले करण्यात आले होते. यामुळे रात्रभर लाखो लिटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे अज्ञाताने साखळी कुलूप घेऊन पोबारा केलेला आहे.महसूल विभागाने बुधवारी दरवाजा बसविला. मात्र, संबंधित विभागाने यावर कोणतीच ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे अज्ञात लोकांचे फावत असल्याचा सूर नागरिकांमधून निघत आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी