शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आजीबाईंचा बटवा अन्‌ कोरोनाला हटवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST

जालना : आज वैद्यकशास्त्राने विज्ञानाच्या मदतीने मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे ॲलोपॅथीला जगमान्यता मिळाली असून, यातून लवकरात ...

जालना : आज वैद्यकशास्त्राने विज्ञानाच्या मदतीने मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे ॲलोपॅथीला जगमान्यता मिळाली असून, यातून लवकरात लवकर आजारातून मुक्त होता येते हे खरेही आहे. परंतु ज्यावेळी विज्ञान प्रगत नव्हते त्यावेळी मानवाने निसर्गातील विविध वनस्पतींचा औषधी म्हणून उपयोग होऊ शकतो हे सिद्ध करून निरोगी आयुष्य जगू शकतो, हेही दाखवून दिले आहे.

आज प्रत्येकाच्या घरी स्वयंपाकघर हे असतेच. या स्वयंपाकघरातील तिखट-मिठाचा डब्बा म्हणजे एक प्रकारे औषधांचा डबा म्हणून त्याची ओळख आहे. भाजी चिरताना अथवा अन्य कुठलेही काम करताना रक्त निघाल्यास लगेचच हळदीची पूड अथवा त्यावर चुना लावून ते थांबविले जात. लहान मुलांना खोकला आल्यास लगेचच हळद, दूध आणि गूळ टाकून ते तीन ते चार दिवस दिल्यावर खोकला थांबत असे. यासह घरात लवंग, इलायची, सुंठ, जीरे, मिरे याही औषधीच आहेत. मसाल्यांच्या पदार्थातील वनस्पतींचा सहभागही महत्त्वाचा ठरतो. घशात खवखव होत असल्यास सकाळी उठून मिठाच्या पाण्याच्या गुळणी केल्यास लगेचच घसा मोकळा होतो. त्यामुळे आजी बाईचा बटवा म्हणजेच घरातील उपचार पद्धती ही कोरोनापासून दूर ठेवते.

आजीबाईंच्या बटव्यात काय?

कोरोनाचा आजार हा नेमका सर्दी आणि खोकल्यासारखा आहे. वेळीच काळजी घेतल्यास त्यातून बरे होता येते. याची तीव्रता ही तीन दिवस असते. परंतु आता अनेक जण धीर सोडत असल्याने चिंता वाढली आहे. सर्दीला न घाबरता इलाज केल्यास कोरोना होऊ शकत नाही, हा अनुभव आहे. - कडूबाई गाढे, भाटेपुरी

आजच्या आजारांवर मात करण्यासाठी लगेचच बाजारात जाऊन औषधी आणल्या जातात. परंतु जुन्या काळात हे शक्य नव्हते. त्यामुळे आधी घरगुती इलाजवर भर दिला जात होता. न राहिल्यास नंतरच वैद्यांकडे नेले होते. त्यामुळे आधीची घरे ही जुन्या औषधांनी भरलेली होती. - शांताबाई रत्नपारखी, जालना

जुन्या काळात महिला असो की, पुरुष हे सहनशील होते. किरकोळ दुखण्यांना ते जुमानात नसत. कारण ते चालणे, शेतात कामे करणे अशी कष्टांची कामे करत. आज सर्वत्र अल्हादपणा आला आहे. त्यामुळे सहनशीलता कमी झाल्याने दुखणी वाढत असल्याचे चित्र आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. - इंदूबाई इंगळे, जालना

आजचे युग हे इन्स्टंटचे आहे. एखाद्याला दोन ते तीन वळेस प्रयत्न करूनही मोबाईल लागला नाही की, चीड येते. तसे आयुर्वेदाचे नाही. यातील उपचार पद्धतीसाठी नाडीपरीक्षा केली जाते. तसेच दिलेली औषधी ही किमान आठ ते पंधरा दिवस घेतल्यावर त्याचे परिणाम दिसतात. परंतु आज वेळेचा अभाव असल्याने इन्स्टंटला महत्त्व आले. परंतु आयुर्वेदाचे महत्त्व पूर्वीही होते आणि ते कायम राहील हे कोरोनाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. - डॉ. अनुप कोहाळे, आयुर्वेदिक तज्ज्ञ

कशाचा काय फायदा?

हळदीचे महत्त्व पटले

कोरोना काळात सर्वात जास्त मागणी वाढली ती हळदीची. यातील पोषक घटकांमुळे सर्दी, खोकल्यापासून बचाव होतो. तसेच जीवनसत्व वाढीसाठीदेखील हळद महत्त्वाची ठरते. हळद प्रशानाने प्रतिकारशक्तीत वाढ होते.

बहुउपयाेगी लवंग

लवंग हा गरम पदार्थ म्हणून ओळखला जातो. कुठल्याही मसाल्यांमध्ये लवंगेचा वापर हा ठरलेला असतो. मळमळ, उलटी होत असल्यास लवंग चघळल्यास चांगला परिणाम होतो. कोरोनामुळे याची मोठी मागणी वाढली आहे.

बहुगुणी मीठ

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे हा खूप प्राचीन इलाज आहे. घशात खवखव होत असल्यास कोमट पाण्यात मीठाची चिमूट टाकून गुळणी केल्यास घशातील खवखव ही अर्धा तासांत कमी होऊन हमखास आराम पडतो.