शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

सरकार अन् मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होणार -बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:56 IST

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्यास सरकार आणि मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी येथील गुरूगणेश मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजप-शिवसेनेच्या भूलथापांमुळे जनता त्यांना पुरती वैतागली आहे. आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्यास सरकार आणि मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होईल. काँग्रेस पक्ष हा जनतेच्या मनातील पक्ष आहे, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी येथील गुरूगणेश मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला.पुढे बोलतांना थोरात म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार हे राज्यघटनेला नख लावण्याचे काम करत आहे. भारताची राज्यघटना तयार करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चौफेर विचार केल्यानेच आज समाजातील गरीबांना सन्मान मिळाला आहे. त्यांना मतदानाच हक्क दिल्यानेच हे शक्य झाले. राज्य घटनेत समता, बंधूता आणि एकोप्याला महत्व दिले आहे. हे तत्वज्ञान संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानातून मांडले आहे. पसायदानातील अनेक तत्वांचे प्रतिबिंब हे राज्यघटनेत दिसत असल्याचेही थोरात यांनी नमूद केले.राज्यात दुष्काळाने शेतकरी आत्महत्या करत आहेत. बेराजगारीचा प्रश्न गंभीर आहे. पुरामूळे नागरिक हैराण असतांना मुख्यमंत्री मात्र प्रचारात व्यस्त आहे. यावरूनच त्यांना शेतकरी आणि सामान्यांची किती काळजी आहे. हे दिसून येते. कर्जमाफी, कर्जाचे पुनर्गठन आणि पीकविमा देण्याच्या नावाखाली देखील सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप थोरात यांनी केला. पीककर्ज वाटप केवळ ३० टक्केच असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच ३४ हजार कोटीची कर्जमाफीची घोषणा खोटी असून, केवळ १२ हजार कोटी रूपयांचेच कर्जमाफ झाले आहे. ते करण्यासाठी देखील अनेक अटी व शर्थीुळे शेतकरी हैराण असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेवरही त्यांनी जोरदार टीका करून पीकविम्याचा मोर्चाही त्यांनी चुकीच्या कंपनी समोर काढल्याचे सांगितले.सत्तेत राहून मंत्री मंडळ बैठक तसेच विधानसभेत आवाज उठविण्या ऐवजी शिवसेना केवळ दिखावा करत असल्याचे थोरात म्हणाले. १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडून काहीजण बाजूला झाले. परंतु मुख्यमंत्री काँग्रेसचाच झाला होता याची आठवण करून देतांनाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नामोल्लेख मात्र थोरतांनी खुबीने टाळला.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमास माजी आ. कैलास गोरंट्याल, कल्याण काळे, धोंडीराम राठोड, शकुंतला शर्मा, अ.भा. काँग्रेस समितीचे सदस्य भीमराव डोंगरे, कल्याण दळे, माजी जिल्हाध्यक्ष आर.आर. खडके, रामप्रसाद कुलवंत, माजी मंत्री अनिल पटेल, माजी नगराध्यक्ष बाबुराव कुलकर्णी, राजेंद्र राख, राजेश राठोड, राजेश काळे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विमल आगलावे, राम सावंत, बदर चाऊस आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष शेख महेमूद यांनी केले.अशोक चव्हाण : मराठवाड्याला राज्य सरकारकडून सापत्न वागणूकराज्यातील युती सरकार हे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. बेरोजगारी वाढत असून, शेतकरी आत्महत्या होत आहेत. जवळपास १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्चन करण्या ऐवजी यात्रा काढून आपल्या कामांचा गवगवा मुख्यमंत्री करत आहे. यातूनच सरकारला शेतक-यांविषयी किती जिव्हाळा आहे, हे दिसून येते. मराठवाडा विभागाला हे सरकार सावत्र मुला सारखी वागणूक देत आहे. मराठवाड्यात ना गुंतवणूक आली ना रोजगाराचा प्रश्न सुटला.आगामी काळात युती सरकारला पराभूत करण्यासाठी आपसातील गटबाजी दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मराठवाडा विभागाच्या अनुशेषा संदर्भात लढा उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली. इव्हीममध्ये भाजपच्या दिग्गजांनी तांत्रिक घोटाळा केला आहे. परंतु तो सिध्द करता येत नसल्याने त्यांची चलती असल्याचे चव्हाण म्हणाले. भाजपमधिल मेगा भरती ही धाक दाखवून केली जात असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या धूळफेकीची जागृती करावी.कुलकर्णींना निवडून आणाऔरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव कुलकर्णी यांना पक्षाने संधी दिली आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मतदारांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मेळाव्यात बोलतांना व्यक्त केली. सकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी आ. राजेश टोपे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणBalasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरात