शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

राजुरातील चारा छावणीने पशुपालकांची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:36 IST

चारा छावणी सुरू झाल्यामुळे परिसरातील पशुपालकांची चिंता मिटली असून दिवसेंदिवस या छावणीत जनावरांची संख्या वाढत चालली

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : येथे चारा छावणी सुरू झाल्यामुळे परिसरातील पशुपालकांची चिंता मिटली असून दिवसेंदिवस या छावणीत जनावरांची संख्या वाढत चालली असल्याचे छावणी चालक ज्ञानेश्वर पुंगळे यांनी सांगीतले.यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळाच्या दाहकतेने सामान्यासह शेतकरीवर्ग हवालदिल झालेला आहे. त्यातच पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, मजुरांना रोजगार इ. समस्यांनी नागरिक हैराण आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे चारा समस्येने शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे जिकिरीचे होऊन बसले होते. तसेच चा-याचे दर गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांना पशंूचे संगोपन करणे अवघड होऊन बसले होते. पशुपालकांनी नाइलाजाने जनावरांना बाजारचा रस्ता दाखवण्यास सुरूवात केली होती. मात्र रविवार पासून येथे चारा छावणी सुरू झाल्याने पशुपालकांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. या चारा छावणीत जनावरांना मुरघास, ऊस, ढेप, शाळूचा चारा, कुट्टी इ.खाद्य दिले जात आहे. तसेच पाण्याची सोय होत असल्याने शेतक-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.पंचक्रोशीतील पन्नास खेड्यांतून राजूरला एकमेव चारा छावणी असल्याने शेतक-यांना नाइलाजाने जनावरे येथे आणावी लागत आहेत. सध्या शासनाकडे अनेक गावांतून चारा छावणीचे प्रस्ताव दाखल आहेत. परंतु, प्रशासनाकडे मंजुरी अभावी धूळ खात पडून आहे.तसेच शेतक-यांच्या सोयीसाठी चांधई ठोंबरी, बाणेगाव, लोणगाव परिसरात चारा छावणीला मंजुरी देऊन पशुपालक शेतक-यांना दिलासा देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळcowगायFarmerशेतकरी