शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राजुरातील चारा छावणीने पशुपालकांची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:36 IST

चारा छावणी सुरू झाल्यामुळे परिसरातील पशुपालकांची चिंता मिटली असून दिवसेंदिवस या छावणीत जनावरांची संख्या वाढत चालली

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : येथे चारा छावणी सुरू झाल्यामुळे परिसरातील पशुपालकांची चिंता मिटली असून दिवसेंदिवस या छावणीत जनावरांची संख्या वाढत चालली असल्याचे छावणी चालक ज्ञानेश्वर पुंगळे यांनी सांगीतले.यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळाच्या दाहकतेने सामान्यासह शेतकरीवर्ग हवालदिल झालेला आहे. त्यातच पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, मजुरांना रोजगार इ. समस्यांनी नागरिक हैराण आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे चारा समस्येने शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे जिकिरीचे होऊन बसले होते. तसेच चा-याचे दर गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांना पशंूचे संगोपन करणे अवघड होऊन बसले होते. पशुपालकांनी नाइलाजाने जनावरांना बाजारचा रस्ता दाखवण्यास सुरूवात केली होती. मात्र रविवार पासून येथे चारा छावणी सुरू झाल्याने पशुपालकांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. या चारा छावणीत जनावरांना मुरघास, ऊस, ढेप, शाळूचा चारा, कुट्टी इ.खाद्य दिले जात आहे. तसेच पाण्याची सोय होत असल्याने शेतक-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.पंचक्रोशीतील पन्नास खेड्यांतून राजूरला एकमेव चारा छावणी असल्याने शेतक-यांना नाइलाजाने जनावरे येथे आणावी लागत आहेत. सध्या शासनाकडे अनेक गावांतून चारा छावणीचे प्रस्ताव दाखल आहेत. परंतु, प्रशासनाकडे मंजुरी अभावी धूळ खात पडून आहे.तसेच शेतक-यांच्या सोयीसाठी चांधई ठोंबरी, बाणेगाव, लोणगाव परिसरात चारा छावणीला मंजुरी देऊन पशुपालक शेतक-यांना दिलासा देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळcowगायFarmerशेतकरी