शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

आठ विभागांतून ११५ टन कचऱ्याचे संकलन ; गाड्यांना समस्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

जालना : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटाविला आहे. शहर स्वच्छतेकडे पालिकेचे विशेष लक्ष आहे. मात्र, घंटागाड्यांमध्ये ...

जालना : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटाविला आहे. शहर स्वच्छतेकडे पालिकेचे विशेष लक्ष आहे. मात्र, घंटागाड्यांमध्ये निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्यांमुुळे काही भागात दैनंदिन घंटागाड्या पाहोचत नाहीत. त्यामुळे तांत्रिक समस्या सोडविण्यासह घंटागाड्यांची संख्या वाढविणेही गरजेचे आहे.

बाजारपेठेसह शहर स्वच्छतेसाठी ५० घंटागाड्या आहेत. त्यात काही घंटागाड्या सतत तांत्रिक अडचणींमुळे बंद असतात. घंटागाड्या बंद राहत असल्याने काही भागात दैनंदिन कचरा संकलित करता येत नाही. दुसरीकडे कार्यरत इतर घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतील कचरा संकलित होतो. तर बाजारपेठेत दोन वेळेस कचरा संकलित केला जातो.

वॉच ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा

शहराच्या विविध भागांत दररोज सकाळी व सायंकाळी कचऱ्याचे संकलन केले जाते. घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. याद्वारे नियंत्रण राहते.

शहरातील आठ विभागांत आठ स्वच्छता निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारीनुसार हे अधिकारी त्या- त्या भागात जाऊन कामे करून घेत आहेत.

जमा झालेल्या कचऱ्याचे सेप्रेशन करण्यासह खतप्रक्रिया सुरू

शहरातील विविध भागांतून जमा करण्यात येणारा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकला जातो. डम्पिंग ग्राऊंडवरील यंत्रणेच्या माध्यमातून नष्ट न होणारा कचरा हा वेगळा केला जात आहे. इतर कचऱ्यांतून खतनिर्मितीची प्रक्रिया केली जात आहे.

नगरपालिकेने सामनगाव येथेही कचराप्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही प्रमाणात येथे खतनिर्मिती करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणे गरजेचे आहे.

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींसह अधिकारी, कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. घरोघरी रोज घंटागाडी जावी, यासाठी नियोजन केले आहे. बाजारपेठेतील कचरा नियमित दोन वेळेस संकलित केला जातो. शहरातील आठ विभागांत स्वच्छता निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्यामार्फत तक्रारींचे निवारण केले जाते. शिवाय कचऱ्यापासून खतनिर्मितीही केली जाते.

- राहुल मापारी, न. प. स्वच्छता अभियंता