शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

जुना जालन्यातील निर्जळीने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 01:11 IST

गत दहा ते बारा दिवसांपासून जुना जालना भागात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गत दहा ते बारा दिवसांपासून जुना जालना भागात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी पैठण येथून जालन्याकडे येणारी जलवाहिनी निखळल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे. निखळलेला पाईप पूर्ववत बसविण्यासाठी मंगळवारपासून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.पैठण ते पाचोड मार्गाचे रूंदीकरण सुरू असताना बारा दिवसांपूर्वी पोकलेनचा धक्का लागून जालना शहराला पाणीपुरवठा करणारा पाईप निखळला. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. या घटनेची देखभाल दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा एकदा ही पाईपलाईन पाणीपुरवठ्याचा अतिरिक्त दाब आल्याने सोमवारी मध्यरात्री फुटली. ही पाईपलाईन फुटल्याने पैठण धरणातून होणारा पाणीपुरवठा थांबविण्यात आला होता.सोमवारी मध्यरात्री पाईप निखळल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ही माहिती सकाळी कळाल्यानंतर मुख्याधिकारी नितीन नार्वेकर तसेच पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजेश बगळे, सभापती स्वामी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. परंतु, हे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत किचकट असल्याने त्यासाठी दोन क्रेन मागवून ही जलवाहिनी एकमेकांमध्ये गुंतविण्याचे काम करण्यात आले. यावर आता सिमेंटचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. बुधवारी देखील यासंबंधीची देखभाल, दुरुस्ती युध्दपातळीवर सुरू असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.नगरसेवकांनीच गरजेनुसार पुरवावेत टँकरजुना जालना भागातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी पालिकेने त्या- त्या भागातील नगरसेवकांनी आवश्यक तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. याचे सर्व देयके पालिकेकडून देण्यात येणार आहेत.नागरिकांना पाणी देणे हा आमचा उद्देश असून, हे पाणी जेईएस महाविद्यालयाजवळील जलशुध्दीकरण केंद्रातून पुरविले जाणार आहे. हा निर्णय झाला असला तरी बुधवारी अद्यापही कुठल्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला, याच तपशील पालिकेकडून कळू शकला नाही.

टॅग्स :WaterपाणीJalana Muncipalityजालना नगरपरिषद