शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

जुना जालन्यातील निर्जळीने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 01:11 IST

गत दहा ते बारा दिवसांपासून जुना जालना भागात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गत दहा ते बारा दिवसांपासून जुना जालना भागात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी पैठण येथून जालन्याकडे येणारी जलवाहिनी निखळल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे. निखळलेला पाईप पूर्ववत बसविण्यासाठी मंगळवारपासून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.पैठण ते पाचोड मार्गाचे रूंदीकरण सुरू असताना बारा दिवसांपूर्वी पोकलेनचा धक्का लागून जालना शहराला पाणीपुरवठा करणारा पाईप निखळला. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. या घटनेची देखभाल दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा एकदा ही पाईपलाईन पाणीपुरवठ्याचा अतिरिक्त दाब आल्याने सोमवारी मध्यरात्री फुटली. ही पाईपलाईन फुटल्याने पैठण धरणातून होणारा पाणीपुरवठा थांबविण्यात आला होता.सोमवारी मध्यरात्री पाईप निखळल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ही माहिती सकाळी कळाल्यानंतर मुख्याधिकारी नितीन नार्वेकर तसेच पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजेश बगळे, सभापती स्वामी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. परंतु, हे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत किचकट असल्याने त्यासाठी दोन क्रेन मागवून ही जलवाहिनी एकमेकांमध्ये गुंतविण्याचे काम करण्यात आले. यावर आता सिमेंटचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. बुधवारी देखील यासंबंधीची देखभाल, दुरुस्ती युध्दपातळीवर सुरू असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.नगरसेवकांनीच गरजेनुसार पुरवावेत टँकरजुना जालना भागातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी पालिकेने त्या- त्या भागातील नगरसेवकांनी आवश्यक तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. याचे सर्व देयके पालिकेकडून देण्यात येणार आहेत.नागरिकांना पाणी देणे हा आमचा उद्देश असून, हे पाणी जेईएस महाविद्यालयाजवळील जलशुध्दीकरण केंद्रातून पुरविले जाणार आहे. हा निर्णय झाला असला तरी बुधवारी अद्यापही कुठल्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला, याच तपशील पालिकेकडून कळू शकला नाही.

टॅग्स :WaterपाणीJalana Muncipalityजालना नगरपरिषद