शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

निर्बंधांच्या अंमलबजावणीचे प्रशासनासमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:27 IST

अन्य आजार असलेल्यांसाठी तर हा कोरोनाचा स्टेन जीवघेणा ठरत आहे. एकीकडे कोविडवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे ...

अन्य आजार असलेल्यांसाठी तर हा कोरोनाचा स्टेन जीवघेणा ठरत आहे. एकीकडे कोविडवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अनेक ठोस निर्णय घेतले आहेत. त्यात जमावबंदी लावण्यात आली असून, त्याचे पालन होताना दिसत नाही. दुसरीकडे मास्क परिधान केल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहनही धुडकावले जात आहे. एकूणच दंडाची रक्कम ही २०० रुपये असली तरी ती देण्यासही विनामास्क फिरणाऱ्यांची तयारी नसल्याचे दिसून येत आहे. पालिका, पोलीस, तसेच शिक्षकांच्या मदतीने शहरात १२ पथकांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जवळपास अडीच हजार जणांकडून साडेचार लाख रुपयांचा दंड वसूल केल्याचेही सांगण्यात येत आहे.

कडक निर्बंध लावण्याची वेळ

कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून, त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. ही वाढ चिंताजनक असून, शहराचा असा एकही भाग नाही, की जेथे पत्रे ठोकलेले नाहीत. त्यामुळे घरातील सर्व परिवारांनाच यात भरडून जावे लागत आहे. घरात सर्व जण आजारी असल्याने रोजचे जगणेही अवघड झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन करणे किंवा न करणे हा सर्वस्वी प्रशासनाचा निर्णय आहे. आधी जे निर्बंध आहेत, त्यांची कडक पद्धतीने अंमलबजावणी व्हावी.

अर्जुन खोतकर, माजी मंत्री

--------------

जनतेने काळजी घ्यावी

कोरोनाकाळात लॉकडाऊन हा उपाय महत्त्वाचा आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेवटचे अस्त्र म्हणून लॉकडाऊन होय; परंतु ते लावल्याने हातावर पोट असणाऱ्यांची मोठी अडचण होईल हे जरी खरे असले तरी, नागरिकांनी लॉकडाऊन टाळण्यासाठी स्वत: काळजी घेणे गरजेचे आहे.

भास्कर अंबेकर, माजी नगराध्यक्ष

-----------------------------

गर्दी न करण्याचे आवाहन

आज अनेक भागांमध्ये कोरोनाने हात-पाय रोवले आहेत. कोणाला कोरोनाची लक्षणे आहेत की नाही, हे देखील समजत नाही. त्यामुळे सर्दी, खोकला आणि ताप वाढल्यास तातडीने चाचणी करणे गरजेचेे आहे. अनेक जण भीतीपोटी चाचणीही करीत नाहीत. ही बाब गंभीर आहे. मास्क वापरण्यासह किरकोळ कामांसाठी गर्दी टाळल्यास संक्रमणाचा वेग कमी होऊ शकतो.

आ. कैलास गोरंट्याल, जालना

----------------------------

पोलिसी खाक्या दाखवाच

आज कोरोनाने शहर व परिसरात कहर केला आहे. एकट्या जालन्यात २०० ते ३०० रुग्ण आढळत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या आवाहनाकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनीच नागरिकांना खाक्या दाखविण्याची वेळ आली आहे. जमावबंदी असो, की विनामास्क फिरणे असो, यावर वचक राहिल्यासच जनता सतर्क होईल.

राजेंद्र राख, कार्याध्यक्ष जिल्हा काँग्रेस, जालना