शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
2
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
3
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
4
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
5
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
6
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
7
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
8
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
9
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
10
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
11
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
12
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
13
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
14
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
15
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
16
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
17
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

केंद्रीय पथकाचा दौरा सोपस्कार ठरू नये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:37 AM

नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकातील अधिकारी रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आधी पावसाच्या प्रतीक्षेने आणि नंतर पावसाच्या कहरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपाचे उत्पन्न घटले असून, दर्जा घसरल्याने सोयाबीन आणि मका कवडीमोल भावाने विक्री करावी लागली. आता कपाशीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकातील अधिकारी रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यात सहा गावांना भेटी देऊन पिकांची स्थिती जाणून घेणार आहेत. यापूर्वीही असे पथक आले होते, त्याचा कुठलाच लाभ झाला नाही, त्यामुळे हे पथक येऊन आमच्या पदरात काय पडणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.जालना जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून सततच्या दुष्काळामुळे शेतकरी संकटातच आहे. मध्यंतरी राज्य सरकारने जी दीड लाख रूपयांची कर्जमाफी जाहीर केली होती, त्यातील अनेक शेतकरी अद्याही या योजनेपासून वंचित असल्याचे वास्तव आहे. त्यातच पीकविमा कंपन्यांनी विमाहप्ता भरतांना जी रक्कम वसूल केली, त्या तुलनेत नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये केंद्राचे पथक पाहणी दौ-यावर आले होते. त्यावेळी कोरडा दुष्काळ होता आणि आता परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याची पाहणी करण्यासाठी हे अधिकारी रविवारी जालना जिल्ह्यातील केळीगव्हाण, दरेगाव, पिंपळगाव थोटे, चांदई एक्को, गवळी पोखरी आणि अकोला देव या गावांना भेटी देणार आहे.या भेटी दरम्यान ते प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी त्या-त्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना सतर्क राहण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.फळबागांनाही भेटी द्याव्यातरविवारी केंद्रीय पथकाचे अधिकारी दौ-यावर येत आहेत. या अधिका-यांनी फळबागांना भेटी द्याव्यात, अशी मागणी कडवंची येथील सरपंच चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर या अवकाळी पावसामुळे डाळिंब तसेच मोसंबी बागांचेही मोठे नुकसान झाले असून, त्या-त्या भागातील फळबागांनाही पथकातील अधिका-यांनी भेटी द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसFarmerशेतकरी