शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान... १८ दिवसांत ७०० रुग्णांची भर : मास्क न लावल्यास ५०० रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:57 IST

जिल्ह्यात कोरोनावाढीमागे नेमके कुठले कारण आहे, हे समजू शकले नसले तरी नागरिकांची बेफिकिरीदेखील तेवढीच जबाबदार असल्याचे मानले जाते. मध्यंतरी ...

जिल्ह्यात कोरोनावाढीमागे नेमके कुठले कारण आहे, हे समजू शकले नसले तरी नागरिकांची बेफिकिरीदेखील तेवढीच जबाबदार असल्याचे मानले जाते. मध्यंतरी शासकीय पातळीवरही कोरोना हद्दपार झाल्यासारखेच वातावरण होते. कोरोना रुग्णांना चांगली सेवा आणि त्यांच्यावर इलाज करण्यासाठी कोविड केअर रुग्णालयांची उभारणी विक्रमी वेळेत जिल्हा प्रशासन आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने झाली होती. त्यातच जिल्हा रुग्णालयाची मुख्य इमारतही गांधी चमन येथील महिला रुग्णालयात हलवून तेथेदेखील कोरोनाबाधितांवर उपाय केले जात होते. परंतु आता महिला रुग्णालयातील ओपीडी ही पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलविली आहे. त्यातच नवीन रुग्ण वाढत असल्याने ही बाब तांत्रिकदृष्ट्या अति घाईत केल्याचे दिसून येत आहे.

एकूणच जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग, सामान्य रुग्णालय आणि अन्य यंत्रणांना आता पुन्हा सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोरोनाची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. जालना शहरासह पालिकेतील यंत्रणांना आळस झटकून कामे करण्याचे सांगितले आहे.

मास्क नसल्यास ५०० रुपयांचा दंड

जालना पालिकेने आता कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे आज केवळ पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर असून, वेळ पडल्यास पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. मागील काळात शिक्षकांनाही रस्त्यावर उतरून नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी नियुक्त केले होते. तशीच स्थिती निर्माण झाल्यास पुन्हा एकदा शिक्षकांना नियुक्त केले जाईल, असे सांगण्यत आले. मंगल कार्यालय, कोचिंग क्लास यांनाही सक्त ताकीद देण्यात आली असून, मंगल कार्यालयात समारंभासाठी केवळ ५० ते शंभर व्यक्तींचीच परवानगी देण्यात आली आहे.

चौकट

मास्क, सॅनिटायझरच्या मागणीत वाढ

कोरोनापासून बचावासाठी ढाल म्हणून मास्कचा वापर महत्त्वाचा आणि अनिवार्य केला आहे. मध्यंतरी हा मास्क वापरण्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले होते. अनेकांनी मास्क हे ठेवणीतील कपड्याप्रमाणे घरी सोडले हाेते. ते आता पुन्हा काढण्याची वेळ आली असून, सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क नसल्यास पालिकेकडून २०० रुपयांवरून दंडाची रक्कम वाढवून ती ५०० रुपये केली आहे. तसेच सुरक्षित अंतरासाठी व्यापारी, उद्योजकांना सूचना दिल्या आहेत. सॅनिटायझरचा वापर पुन्हा एकदा बंधनकारक केला आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची मागणी नव्याने वाढली आहे.