शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

पुरात बस घालून प्रवाशांच्या जीवाशी खेळ; चालकाविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 15:34 IST

ग्रामस्थांनी धाव घेवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले

ठळक मुद्देकसुरा नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी जात होते.असे असतानाही प्रवाशांचा जीव धोक्यात घालून चालकाने बस पाण्यात घातली.

जालना : पाण्याचा अंदाज न आल्याने २५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीपात्रात कोसळल्याची घटना परतूर तालुक्यातील श्रीष्टी गावाजवळील कसुरा नदीवर गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती. ग्रामस्थांनी धाव घेऊन २५ प्रवाशांना वाचविले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या प्रकरणी बस चालक के. एम. गिरी याच्याविरुध्द आष्टी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, चालकाला निलंबितदेखील करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूळ यांनी दिली. ( bus drive in flood and playing with the lives of the passengers; Filed a crime against the driver) 

तालुक्यात दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे नद्या-नाल्यांना पूर आलेला आहे. यातच गुरुवारी रात्री परतूर आगाराची (एमएच.१४.बीटी.२२८०) ही बस परतूरहून २३ प्रवासी घेऊन आष्टीकडे जात होती. या बसमध्ये दोन लहान मुलांसह २३ प्रवासी व चालक, वाहक असे एकूण २५ प्रवासी होते. श्रीष्टी गावाजवळ कसुरा प्रकल्प आहे. सध्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. कसुरा नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी जात होते. असे असतानाही प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बस चालकाने बस पाण्यात घातली. पुढे पाण्याचा अंदाज न आल्याने बस नदीपात्रात कोसळली. ग्रामस्थांनी धाव घेवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. बस चालकांना प्रवाशांचा जीव धोक्यात घालून धोकादायक ठिकाणी बस घेऊन न जाण्याच्या सूचना आहेत. असे असतानाही बसचालक के. एम. गिरी यांनी बस पाण्यात घातली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा - - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अडचणीत; बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास होणारच- कार चोरून पुण्यातून बाहेर पडले; GPS मुळे ३०० किमीवर पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीstate transportएसटीJalanaजालना