शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘बीओटी’तून जालना पालिकेला चुना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:29 IST

पालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या उद्देशाने अनेक ठिकाणी दुकाने व गाळे बांधण्यात आले असून, नाममात्र दराने ते भाडेतत्त्वावर खाजगी व्यक्तींना देण्यात आले आहेत. मात्र, सुमारे बारा वर्षांपासून भाडे वसुलीच झालेली नसल्याने यावर पालिकेला पाणी सोडावे लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांच्या उदासीन धोरणांमुळे पालिकेचे उत्पन्न वाढू शकलेले नाही.

ठळक मुद्देभूखंडांचे श्रीखंड कुणाच्या ताटात? : टाऊन हॉलमधील बारा वर्षांच्या गाळे भाड्यावर पाणी

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या उद्देशाने अनेक ठिकाणी दुकाने व गाळे बांधण्यात आले असून, नाममात्र दराने ते भाडेतत्त्वावर खाजगी व्यक्तींना देण्यात आले आहेत. मात्र, सुमारे बारा वर्षांपासून भाडे वसुलीच झालेली नसल्याने यावर पालिकेला पाणी सोडावे लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांच्या उदासीन धोरणांमुळे पालिकेचे उत्पन्न वाढू शकलेले नाही. पालिकेच्या मालकीच्या भूखंडांवर बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा (बीओटी) या नावाखाली गाळे काढण्यात येऊन पालिकेला चुना लावण्यात आल्याचे उघडकीस येत आहे. पालिकेच्या भूखंडांचे श्रीखंड कुणाच्या ताटात गेले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.जालना शहरातील आझाद मैदान, टाऊन हॉल, जवाहरलाल बाग, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, गांधी चमन परिसर, भाग्यनगर उड्डाणपुलाखालील दुकाने या व अन्य भागांत नगर पालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी दोनशेपेक्षा अधिक दुकाने बांधली. तेव्हा वेगवेगळ्या कंत्राटदारांसोबत ‘बीओटी’ पद्धतीने करार पालिकेतर्फे करण्यात आला.जुना जालन्यातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या टाऊन हॉल येथे बीओटी तत्त्वावर कॉम्प्लेक्स बांधण्यात आले. यात ५२ दुकाने आणि पहिल्या मजल्यावर सभागृह, वाचनालय व दोन सभागृह बांधण्यात आली. गाळ्यांचे प्रिमियम म्हणून प्रति दुकान चार ते पाच लाख रुपये कंत्राटदाराने बांधकामाच्या खर्चापोटी संबंधितांकडून घेतले. मोबदल्यात कंत्राटदाराने वाचनालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह व अन्य दोन मोठे सभागृह बांधून दिले. मात्र, ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधीचे भाडेकरार करण्यात आल्याने ते रद्दबातल ठरविण्यात आले. मर्यादेपेक्षा अधिक कालावधीचा करार आणि कंत्राटदाराची भूमिका या त्रांगड्यामुळे ५२ गाळेधारकांकडे तब्बल बारा वर्षांपासून भाडे थकले आहे. पालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कॉम्प्लेक्स बांधण्यात आले असले तरी प्रत्यक्षात उत्पन्न मिळत नसून पालिकेचे भूखंड हातचे गेल्याचे चित्र आहे. यातून पालिकेला उत्पन्न मिळाले असते, तर पथदिवे, स्वच्छता व शाळा सुस्थितीत होऊ शकल्या आहेत. पण दुर्दैवाने स्थिती नकारात्मक असल्याने बीओटी प्रकल्प म्हणजे एकप्रकारे पालिकेच्या जागांवर ‘अतिक्रमण’च ठरत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाºयांच्या उदासीन धोरणांमुळे मोक्याच्या जागी बीओटी तत्त्वावर इमारत बांधूनही याचा आर्थिक फायदा पालिकेला झालेला नाही.(उद्याच्या अंकात - मैदानावर केवळ पायºया दुकानदार ‘आझाद’)