शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

‘बीओटी’तून जालना पालिकेला चुना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:29 IST

पालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या उद्देशाने अनेक ठिकाणी दुकाने व गाळे बांधण्यात आले असून, नाममात्र दराने ते भाडेतत्त्वावर खाजगी व्यक्तींना देण्यात आले आहेत. मात्र, सुमारे बारा वर्षांपासून भाडे वसुलीच झालेली नसल्याने यावर पालिकेला पाणी सोडावे लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांच्या उदासीन धोरणांमुळे पालिकेचे उत्पन्न वाढू शकलेले नाही.

ठळक मुद्देभूखंडांचे श्रीखंड कुणाच्या ताटात? : टाऊन हॉलमधील बारा वर्षांच्या गाळे भाड्यावर पाणी

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या उद्देशाने अनेक ठिकाणी दुकाने व गाळे बांधण्यात आले असून, नाममात्र दराने ते भाडेतत्त्वावर खाजगी व्यक्तींना देण्यात आले आहेत. मात्र, सुमारे बारा वर्षांपासून भाडे वसुलीच झालेली नसल्याने यावर पालिकेला पाणी सोडावे लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांच्या उदासीन धोरणांमुळे पालिकेचे उत्पन्न वाढू शकलेले नाही. पालिकेच्या मालकीच्या भूखंडांवर बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा (बीओटी) या नावाखाली गाळे काढण्यात येऊन पालिकेला चुना लावण्यात आल्याचे उघडकीस येत आहे. पालिकेच्या भूखंडांचे श्रीखंड कुणाच्या ताटात गेले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.जालना शहरातील आझाद मैदान, टाऊन हॉल, जवाहरलाल बाग, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, गांधी चमन परिसर, भाग्यनगर उड्डाणपुलाखालील दुकाने या व अन्य भागांत नगर पालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी दोनशेपेक्षा अधिक दुकाने बांधली. तेव्हा वेगवेगळ्या कंत्राटदारांसोबत ‘बीओटी’ पद्धतीने करार पालिकेतर्फे करण्यात आला.जुना जालन्यातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या टाऊन हॉल येथे बीओटी तत्त्वावर कॉम्प्लेक्स बांधण्यात आले. यात ५२ दुकाने आणि पहिल्या मजल्यावर सभागृह, वाचनालय व दोन सभागृह बांधण्यात आली. गाळ्यांचे प्रिमियम म्हणून प्रति दुकान चार ते पाच लाख रुपये कंत्राटदाराने बांधकामाच्या खर्चापोटी संबंधितांकडून घेतले. मोबदल्यात कंत्राटदाराने वाचनालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह व अन्य दोन मोठे सभागृह बांधून दिले. मात्र, ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधीचे भाडेकरार करण्यात आल्याने ते रद्दबातल ठरविण्यात आले. मर्यादेपेक्षा अधिक कालावधीचा करार आणि कंत्राटदाराची भूमिका या त्रांगड्यामुळे ५२ गाळेधारकांकडे तब्बल बारा वर्षांपासून भाडे थकले आहे. पालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कॉम्प्लेक्स बांधण्यात आले असले तरी प्रत्यक्षात उत्पन्न मिळत नसून पालिकेचे भूखंड हातचे गेल्याचे चित्र आहे. यातून पालिकेला उत्पन्न मिळाले असते, तर पथदिवे, स्वच्छता व शाळा सुस्थितीत होऊ शकल्या आहेत. पण दुर्दैवाने स्थिती नकारात्मक असल्याने बीओटी प्रकल्प म्हणजे एकप्रकारे पालिकेच्या जागांवर ‘अतिक्रमण’च ठरत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाºयांच्या उदासीन धोरणांमुळे मोक्याच्या जागी बीओटी तत्त्वावर इमारत बांधूनही याचा आर्थिक फायदा पालिकेला झालेला नाही.(उद्याच्या अंकात - मैदानावर केवळ पायºया दुकानदार ‘आझाद’)