शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

आठ दिवसांपासून भोकरदनचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:10 IST

भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरण कोरडे पडल्याने शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

फकीरा देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरण कोरडे पडल्याने शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही प्रशासन कुठल्याच हालचाली करत नाही.यावर्षी पाऊस नसल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारी दोन्ही धरणे कोरडेठाक पडली आहेत. त्यामुळे भोकरदन शहरासह परिसरातील २५ गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसापासून शहराचा पाणी पुरवठा बंद असून, पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. यासाठी नगरपरिषदेकडून शहरालगतच्या विहिरींचा गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. परंतु, विहिरींमध्ये काही प्रमाणात पाणी येत असल्याने हे पाणी फक्त दोन ते तीन दिवस पुरत आहे. निवडणुकीच्या वेळी मते मागणारे नगरसेवक आता गेले कुठे, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.कागदी घोडे नाचविण्याचे काम पंधरा दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पाहणीही केली. परंतु, हालचाली झाल्या नाहीत. यासाठी नगरपरिषदेनेही विशेष सभा घेऊन टँकरचा प्रस्ताव तयार करुन पाठविला. मात्र, त्याच्यावरही काहीच काम झाले नाही. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन किमान दिवसातून १० टँकरने भोकरदनला पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.

टॅग्स :Damधरणdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई