शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 1:09 AM

राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा मोठा परिणाम औद्योगिक आणि व्यापारी शहर असलेल्या जालन्यात जास्त दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा मोठा परिणाम औद्योगिक आणि व्यापारी शहर असलेल्या जालन्यात जास्त दिसून आला. दररोज काही कोटींची देवाण- घेवाण बँक व्यवहारातून होते. ती आता सलग तीन दिवस ठप्प होणार असल्याने रक्कम सांभाळण्याची मोठी जबाबदारी व्यापारी, उद्योजकांवर आली आहे.जालन्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या जवळपास १५ शाखा आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात तालुका आणि गाव पातळीवर मिळून ही संख्या ३४ च्या घरात पोहोचते. विशेष म्हणजे या राष्ट्रीयकृत बँकांच्या संपामुळे सहकारी बँकांचे व्यवहार सुरू असूनही त्याचा कुठलाच उपयोग झाला नाही. बँकेत रक्कम जमा करण्यापलीकडे सहकारी बँकेत कुठलेच व्यवहार झाले नाहीत.दररोज विविध उद्योजक, व्यापाऱ्यांचे लाखो रूपयांचे धनादेश हे सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा होतात. परंतु याचे क्लिअरिंग हाऊस अर्थात वटविण्याचे केंद्र हे एसबीआयमध्ये आहे. त्यातच ही बँकही संपात सहभागी होती. त्याचा मोठा परिणाम व्यवहारावर झाला आहे. सकाळी येथील शिवाजी पुतळा परिसरात पूर्वीची एसबीएच आणि आता बँक विलिनीकरणानंतरच्या एसबीआय बँकेसमोर बँक युनियनच्या पदाधिकारी तसेच सदस्यांनी जोरदार निदर्शने केली.मागणी : क्लिअरिंग हाऊस नियमित सुरूच ठेवण्याची गरजराष्ट्रीयीकृत बँक अधिकारी, कर्मचा-यांच्या मागण्या रास्त आहेत, त्याकडे सरकार पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राष्ट्रीयकृत बँकांचा संप होत आहे. असे असले तरी, किमान संप सुरू असताना क्लिअरिंग हाऊस असलेल्या बँकेत किमान दोन अधिका-यांची नियुक्ती करून हे काम सुरू ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा परिणाम सहकारी बँकांवर होणार नाही. आणि धनादेश वटण्यास अडचणी येत नाहीत, असे सहायक सरव्यवस्थापक शिरीष देवळे यांनी सांगितले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रStrikeसंपagitationआंदोलन