शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

नऊ मार्चला होणार बागेश्वरी साखर कारखाना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 00:29 IST

आजवर बागेश्वरी साखर कारखान्यातून २ लाख ५१ हजार मे. टन उसाचे सरासरी गाळप झाले आहे. यातून २ लाख ८२ हजार २२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, ९ मार्च रोजी कारखाना बंद होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आजवर बागेश्वरी साखर कारखान्यातून २ लाख ५१ हजार मे. टन उसाचे सरासरी गाळप झाले आहे. यातून २ लाख ८२ हजार २२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, ९ मार्च रोजी कारखाना बंद होणार आहे.परतूर तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा बागेश्वरी साखर कारखाना सुरू झाला तेव्हापासून आजवर सुरळीत व शिस्तीत सुरू आहे. त्यामुळे या भागात नामशेष होणारे उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले. कारखाना प्रशासनाने उसाचे क्षेत्र वाढीसाठी शेतकऱ्यांना अनेक सुविधा व योजना राबवून ऊस लागवडीस चालना दिली. यामुळे या भागात उसाचे क्षेत्र वाढले. शेतक-यांनाही आपला ऊस जाण्याची हमी मिळाल्याने अल्प पाण्यावर नियोजन करून शेतकरी उसाकडे वळला. निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅक वॉटरवर मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली. शेतक-यांनी या पाण्यावर पाईपलाईन करून उसाची लागवड केली. दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे उसाचे पीक धोक्यात आले आहे.मध्यंतरी निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणी शहराची तहान भागविण्यासाठी सोडण्यात आले होते. यावेळी निम्न दुधना प्रकल्प पूर्ण रिकामा झाला होता. यंदा मात्र, परतीच्या पावसाने या धरणात थोडे फार पाणी येण्याबरोबरच उसाच्या पिकाला जिवदान मिळाले.यावर्षी कारखाना परिसरात ७ हजार हेक्टर वर ऊस होता. तर मागील वर्षी १० हजार हेक्टरवर ऊस होता. मागील वर्षी एक महिना लवकर कारखाना सुरू होऊन १२ एप्रील २०१९ रोजी परिसरातील उसाचे पूर्ण गाळप करून बंद झाला होता. यावर्षी मात्र एक महिना उशीरा सुरू होऊनही महिना अगोदरच बंद करण्याची वेळ येत आहे.परिसरात केवळ २५ हजार टन ऊस गाळप राहिला आहे. हा कारखाना जास्तीत जास्त ९ मार्च पर्यंत चालण्याची शक्यता कारखाना प्रशासनाने व्यक्त केली आहे. याचे कारण ब-याच शेतक-यांनी बाहेरच्या कारखान्यास ऊस दिला आहे. मागील वर्षीही काही शेतक-यांनी बाहेर ऊस दिला होता. मात्र, कारखान्याने त्या शेत-यांचा ऊस सहानभुती दाखवून आणला होता. पुढील वर्षी हे चित्र बदलणार आहे. ज्या शेतक-यांनी बाहेर ऊस दिला. त्यांचा ऊस आणण्याची जबाबदारी कारखाना घेण्याची शक्यता कमी आहे. कारण, यावर्षी परतूर तालुक्यात व कारखाना परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी