शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
2
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
3
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
4
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
5
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
6
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
7
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
8
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
9
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
10
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
11
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
12
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
13
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
14
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
15
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
18
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
19
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
20
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार

बदनापूर येथील धरणजोड प्रकल्प अडकला लाल फितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 17:32 IST

सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्प व त्या शेजारी असलेला वाल्हा येथील सिंचन प्रकल्प एकमेकांना जोडण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे.

ठळक मुद्देसोमठाणा येथे अप्पर दुधना प्रकल्पाच्या शेजारी हाकेच्या अंतरावर वाल्हा सिंचन प्रकल्प आहे.अनेक वर्षांपासून हे प्रल्पक एकमेकांना जोडण्याची मागणी होत आहे.

बदनापूर (जालना ) : तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्प व त्या शेजारी असलेला वाल्हा येथील सिंचन प्रकल्प एकमेकांना जोडण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे. परिणामी तालुक्यातील सिंचनावर परिणाम झाला आहे.

तालुक्यातील सोमठाणा येथे अप्पर दुधना प्रकल्पाच्या शेजारी हाकेच्या अंतरावर वाल्हा सिंचन प्रकल्प आहे. अनेक वर्षांपासून हे प्रल्पक एकमेकांना जोडण्याची मागणी होत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे अनेकदा एका सिंचन प्रकल्पात जास्त पाणी येते. परिणामी सोमठाणा धरण ओव्हरफ्लो होवून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. वाहून जाणारे पाणी शेजारील धरणात सोडल्यास परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. वाल्हा धरणापासून काही अंतरावर राजेवाडी साठवण तलाव हा सिंचन प्रकल्प आहे.  शासन ज्याप्रमाणे नदीजोड प्रकल्प राबवित आहे. त्याच धर्तीवर शासनाने हर धरणजोड प्रकल्प राबविण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

या तिन्ही प्रकल्पाखाली या तालुक्यातील सुमारे २० ते २५ गावांमधील हजारो हेक्टर जमीन बारा महिने सिंचनाखाली येवू शकते.  तसेच  तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठीही हे पाणी उपयोगात येवू शकते. तालुक्यातील सिंचन क्षेत्र घटल्यामुळे मोसंबीचे आगार असलेल्या जिल्ह्यात आता नावालाच मोसंबी बागा आहेत.  हजारो हेक्टर बागायती क्षेत्र कोरडवाहू झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पान्नावरही परिणाम झाला आहे. यावर्षी सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पात कमी पाणी असल्यामुळे या प्रकल्पाच्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक गावातील शेतीला या धरणाचे पाणी सोडता आले नाही. मात्र हेच धरण मागील वर्षी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सुमारे महिनाभर या धरणातील पाणी वाहत होते. काही वर्षांपूर्वी प्रशासनाकडून दुधना प्रकल्प व वाल्हा तलाव जोडण्याबाबत प्रस्तावही शासनाकडे गेलेला आहे. परंतु शासनाच्या लालफितीत हा प्रस्ताव अडकला आहे. तालुक्याती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी हा जोडप्रकल्प पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

परिसर सुजलाम् सुफलाम् होईल तालुक्यातील दुधना, वाल्हा व राजेवाडी हे तिन प्रकल्प एकमेकांना जोडल्या गेले तर हा परीसर सुजलाम सुफलाम होईल. शेतीसाठी याचा मोठा फायदा होईल. याबाबत पाठपुरावा सुरू असून काही दिवसापूर्वीच पालकमंत्र्यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली आहे.  या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. हा प्रकल्प झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होईल.- भानुदास घुगे 

जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता प्रस्तावजिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोमठाणा येथील अप्पर दुधना धरणाचे ओव्हरफलोचे पाणी वाहून जात असल्यामुळे हे पाणी वाल्हा धरणात सोडण्यासाठी सोमठाणा व वाल्हा धरण एकमेकांना जोडण्याबाबत एक प्रस्ताव पाठविलेला आहे. त्यामधे जमीन संपादीत करावी लागत नाही. भूमिगत रितीने ही दोन धरणे एकमेकांना जोडली जावू शकतात. हे पाणी पुढे वळवायचेच असेल तर घाणेवाडीलाही वळविता येवू शकते. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकड प्रस्ताव पाठवलेला आहे.- बालाजी क्षीरसागर, तत्कालीन तहसीलदार.

टॅग्स :DamधरणWaterपाणीriverनदीRainपाऊसJalanaजालना