शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

बदनापूर येथील धरणजोड प्रकल्प अडकला लाल फितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 17:32 IST

सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्प व त्या शेजारी असलेला वाल्हा येथील सिंचन प्रकल्प एकमेकांना जोडण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे.

ठळक मुद्देसोमठाणा येथे अप्पर दुधना प्रकल्पाच्या शेजारी हाकेच्या अंतरावर वाल्हा सिंचन प्रकल्प आहे.अनेक वर्षांपासून हे प्रल्पक एकमेकांना जोडण्याची मागणी होत आहे.

बदनापूर (जालना ) : तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्प व त्या शेजारी असलेला वाल्हा येथील सिंचन प्रकल्प एकमेकांना जोडण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे. परिणामी तालुक्यातील सिंचनावर परिणाम झाला आहे.

तालुक्यातील सोमठाणा येथे अप्पर दुधना प्रकल्पाच्या शेजारी हाकेच्या अंतरावर वाल्हा सिंचन प्रकल्प आहे. अनेक वर्षांपासून हे प्रल्पक एकमेकांना जोडण्याची मागणी होत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे अनेकदा एका सिंचन प्रकल्पात जास्त पाणी येते. परिणामी सोमठाणा धरण ओव्हरफ्लो होवून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. वाहून जाणारे पाणी शेजारील धरणात सोडल्यास परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. वाल्हा धरणापासून काही अंतरावर राजेवाडी साठवण तलाव हा सिंचन प्रकल्प आहे.  शासन ज्याप्रमाणे नदीजोड प्रकल्प राबवित आहे. त्याच धर्तीवर शासनाने हर धरणजोड प्रकल्प राबविण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

या तिन्ही प्रकल्पाखाली या तालुक्यातील सुमारे २० ते २५ गावांमधील हजारो हेक्टर जमीन बारा महिने सिंचनाखाली येवू शकते.  तसेच  तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठीही हे पाणी उपयोगात येवू शकते. तालुक्यातील सिंचन क्षेत्र घटल्यामुळे मोसंबीचे आगार असलेल्या जिल्ह्यात आता नावालाच मोसंबी बागा आहेत.  हजारो हेक्टर बागायती क्षेत्र कोरडवाहू झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पान्नावरही परिणाम झाला आहे. यावर्षी सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पात कमी पाणी असल्यामुळे या प्रकल्पाच्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक गावातील शेतीला या धरणाचे पाणी सोडता आले नाही. मात्र हेच धरण मागील वर्षी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सुमारे महिनाभर या धरणातील पाणी वाहत होते. काही वर्षांपूर्वी प्रशासनाकडून दुधना प्रकल्प व वाल्हा तलाव जोडण्याबाबत प्रस्तावही शासनाकडे गेलेला आहे. परंतु शासनाच्या लालफितीत हा प्रस्ताव अडकला आहे. तालुक्याती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी हा जोडप्रकल्प पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

परिसर सुजलाम् सुफलाम् होईल तालुक्यातील दुधना, वाल्हा व राजेवाडी हे तिन प्रकल्प एकमेकांना जोडल्या गेले तर हा परीसर सुजलाम सुफलाम होईल. शेतीसाठी याचा मोठा फायदा होईल. याबाबत पाठपुरावा सुरू असून काही दिवसापूर्वीच पालकमंत्र्यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली आहे.  या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. हा प्रकल्प झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होईल.- भानुदास घुगे 

जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता प्रस्तावजिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोमठाणा येथील अप्पर दुधना धरणाचे ओव्हरफलोचे पाणी वाहून जात असल्यामुळे हे पाणी वाल्हा धरणात सोडण्यासाठी सोमठाणा व वाल्हा धरण एकमेकांना जोडण्याबाबत एक प्रस्ताव पाठविलेला आहे. त्यामधे जमीन संपादीत करावी लागत नाही. भूमिगत रितीने ही दोन धरणे एकमेकांना जोडली जावू शकतात. हे पाणी पुढे वळवायचेच असेल तर घाणेवाडीलाही वळविता येवू शकते. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकड प्रस्ताव पाठवलेला आहे.- बालाजी क्षीरसागर, तत्कालीन तहसीलदार.

टॅग्स :DamधरणWaterपाणीriverनदीRainपाऊसJalanaजालना