शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

उपेक्षितांसाठी बाबासाहेबांनी कशाचीही पर्वा केली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:31 IST

उपेक्षित समाजाच्या न्यायासाठी बाबासाहेबांनी कशाचीही पर्वा केली नाही, म्हणूनच आज तुम्ही- आम्ही ताठ मानेने जगत आहोत, असे प्रतिपादन रमेश शिंदे यांनी येथे बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी अस्पृश्य आणि उपेक्षित समाजासाठी अपार कष्ट घेतले. घर परिवाराकडे दुर्लक्ष करुन हा महामानव एकाएकी झुंज देत असतानाही कधीही डगमगला नाही. ताठर आणि स्पष्ट वक्ते असलेले बाबासाहेब समाजाच्या कल्याणासाठी घेता येईल तेवढी लवचिकतेची भूमिका घेत होते. उपेक्षित समाजाच्या न्यायासाठी बाबासाहेबांनी कशाचीही पर्वा केली नाही, म्हणूनच आज तुम्ही- आम्ही ताठ मानेने जगत आहोत, असे प्रतिपादन रमेश शिंदे यांनी येथे बोलताना केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना शिंदे बोलत होते. यावेळी भीमराव डोंगरे, शेख महेमूद, विजयकुमार पंडित, व्याख्यानमालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती.रमेश शिंदे हे केवळ डॉ. बाबासाहेबांचे अनुयायीच नव्हते तर त्यांनी काही काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर व्यतीत केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सभा लावणे, स्वत: स्टेजची मांडणी करण्यापासून बाबासाहेब सांगतील तो आदेश मानून शिंदे यांनी ते कार्य केलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभलेल्या रमेश शिंदे यांचे व्याख्यान मुद्दामहून आयोजित केल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. आंबेडकरकालीन चळवळ आणि आजच्या चळवळीतील वास्तव या विषयावर मार्गदर्शन करतांना शिंदे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांकडे प्रचंड गुणसंपदा होती. परंतु घरी अठराविश्वे दारिद्र्य असतानाही त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. बाबासाहेब जस- जसे मोठे होऊ लागले तस- तसे त्यांना या समाजाची उपेक्षा कळू लागली. शिक्षण चालू असतानाच अस्पृश्य समाजाला या जोखडातून बाहेर काढण्याची मनोमन इच्छा बाबासाहेबांची होती. अनंत अडचणींवर मात करुन बाबासाहेबांनी वेळप्रसंगी नोकरी केली. परंतु शिक्षण अर्ध्यावर सोडले नाही. खरे तर बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांचे बाबासाहेबांवर खूप मोठे उपकार होते. कारण बाबासाहेबांना जेव्हा केव्हा शिक्षणासाठी पैशाची गरज भासत होती. त्या-त्या वेळी सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना मदत केली. बाबासाहेब आंबेडकरांनी पी.एचडी केल्यानंतर ते डॉक्टर झाले. परंतु ते एवढ्यावरच थांबले नाहीत. पुढील शिक्षणासाठी त्यांना पुन्हा लंडनला जाण्याची वेळ आली. तेव्हा देखील पैशाचाच प्रश्न उभा राहिला. शेवटी बाबासाहेब सयाजीरावांकडे गेले. त्यांना हकीगत कथन केली. परंतु सयाजीरावांनी पैसे देण्याचे कबूल करुन एक अट घातली. पैसे हवे असतील तर नोकरी करावी लागेल. मग कसे करणार, असे जेव्हा सयाजीराव म्हणाले तेव्हा बाबासाहेबांनीही अत्यंत मार्मिक असे उत्तर दिले. ते म्हणाले, मी नोकरीही करीन आणि शिक्षण देखील ! अनंत अडचणींवर मात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विना तिकीट लंडनमध्ये पोहोचले. पदवीही मिळवली परंतु तेथील शिक्षणसम्राटांनी बाबासाहेबांशी वाद घातला आणि कणखर, ताठर असलेल्या बाबासाहेबांनी शिक्षण तर पूर्ण केले मग डिग्रीचे काय करायचे, असे म्हणून ते तेथून परत आले. बाबासाहेब स्वार्थासाठी कधीही लढले नाहीत. परंतु समाजासाठी सर्वस्व दिले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSocialसामाजिक