शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उपेक्षितांसाठी बाबासाहेबांनी कशाचीही पर्वा केली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:31 IST

उपेक्षित समाजाच्या न्यायासाठी बाबासाहेबांनी कशाचीही पर्वा केली नाही, म्हणूनच आज तुम्ही- आम्ही ताठ मानेने जगत आहोत, असे प्रतिपादन रमेश शिंदे यांनी येथे बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी अस्पृश्य आणि उपेक्षित समाजासाठी अपार कष्ट घेतले. घर परिवाराकडे दुर्लक्ष करुन हा महामानव एकाएकी झुंज देत असतानाही कधीही डगमगला नाही. ताठर आणि स्पष्ट वक्ते असलेले बाबासाहेब समाजाच्या कल्याणासाठी घेता येईल तेवढी लवचिकतेची भूमिका घेत होते. उपेक्षित समाजाच्या न्यायासाठी बाबासाहेबांनी कशाचीही पर्वा केली नाही, म्हणूनच आज तुम्ही- आम्ही ताठ मानेने जगत आहोत, असे प्रतिपादन रमेश शिंदे यांनी येथे बोलताना केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना शिंदे बोलत होते. यावेळी भीमराव डोंगरे, शेख महेमूद, विजयकुमार पंडित, व्याख्यानमालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती.रमेश शिंदे हे केवळ डॉ. बाबासाहेबांचे अनुयायीच नव्हते तर त्यांनी काही काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर व्यतीत केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सभा लावणे, स्वत: स्टेजची मांडणी करण्यापासून बाबासाहेब सांगतील तो आदेश मानून शिंदे यांनी ते कार्य केलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभलेल्या रमेश शिंदे यांचे व्याख्यान मुद्दामहून आयोजित केल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. आंबेडकरकालीन चळवळ आणि आजच्या चळवळीतील वास्तव या विषयावर मार्गदर्शन करतांना शिंदे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांकडे प्रचंड गुणसंपदा होती. परंतु घरी अठराविश्वे दारिद्र्य असतानाही त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. बाबासाहेब जस- जसे मोठे होऊ लागले तस- तसे त्यांना या समाजाची उपेक्षा कळू लागली. शिक्षण चालू असतानाच अस्पृश्य समाजाला या जोखडातून बाहेर काढण्याची मनोमन इच्छा बाबासाहेबांची होती. अनंत अडचणींवर मात करुन बाबासाहेबांनी वेळप्रसंगी नोकरी केली. परंतु शिक्षण अर्ध्यावर सोडले नाही. खरे तर बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांचे बाबासाहेबांवर खूप मोठे उपकार होते. कारण बाबासाहेबांना जेव्हा केव्हा शिक्षणासाठी पैशाची गरज भासत होती. त्या-त्या वेळी सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना मदत केली. बाबासाहेब आंबेडकरांनी पी.एचडी केल्यानंतर ते डॉक्टर झाले. परंतु ते एवढ्यावरच थांबले नाहीत. पुढील शिक्षणासाठी त्यांना पुन्हा लंडनला जाण्याची वेळ आली. तेव्हा देखील पैशाचाच प्रश्न उभा राहिला. शेवटी बाबासाहेब सयाजीरावांकडे गेले. त्यांना हकीगत कथन केली. परंतु सयाजीरावांनी पैसे देण्याचे कबूल करुन एक अट घातली. पैसे हवे असतील तर नोकरी करावी लागेल. मग कसे करणार, असे जेव्हा सयाजीराव म्हणाले तेव्हा बाबासाहेबांनीही अत्यंत मार्मिक असे उत्तर दिले. ते म्हणाले, मी नोकरीही करीन आणि शिक्षण देखील ! अनंत अडचणींवर मात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विना तिकीट लंडनमध्ये पोहोचले. पदवीही मिळवली परंतु तेथील शिक्षणसम्राटांनी बाबासाहेबांशी वाद घातला आणि कणखर, ताठर असलेल्या बाबासाहेबांनी शिक्षण तर पूर्ण केले मग डिग्रीचे काय करायचे, असे म्हणून ते तेथून परत आले. बाबासाहेब स्वार्थासाठी कधीही लढले नाहीत. परंतु समाजासाठी सर्वस्व दिले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSocialसामाजिक