शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

विधानसभेसाठी इच्छुकांनी अर्ज भरा, २९ तारखेला कोणाला पाठिंबा देयचा हे सांगू: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:04 IST

लढायचं, समविचारींना पाठिंबा अन् पाडायचंही; तिहेरी सूत्रांमुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही चिंता वाढणार

वडीगोद्री (जि.जालना) : विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची मोठी घोषणा रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये केली. मराठ्यांची ताकद असेल त्याठिकाणी उमेदवार देणार, राखीव जागांवर आपल्या विचारांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, जिथे ताकद नसेल अशा ठिकाणी आपल्या मागण्या मान्य असल्याचे जो उमेदवार ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून देईल, त्याला पाठिंबा देणार, अशी तिहेरी सूत्र सांगणारी भूमिका जरांगे पाटील यांनी शेकडो कार्यकर्ते आणि इच्छुकांच्या उपस्थितीत जाहीर केली. तसेच निवडणुकीसाठी मागणी करणारे अनेक जण आहेत. सर्वांनी अर्ज भरावेत. यादरम्यान सर्व बाबींचा अभ्यास केला जाईल आणि २९ तारेखला कोणी अर्ज मागे घ्यायचा हे सांगितलं जाईल.  ज्यांची नावे जाहीर होतील त्यांच्या मागे समाजाने राहावे, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.

जरांगे पाटील यांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे महायुतीची विशेषत: भाजप आणि विरोधी बाकावर बसणाऱ्या मविआच्या नेत्यांचीही चिंता वाढणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, दाखल गुन्हे मागे घ्यावेत, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मागील दीड वर्षापासून लढा उभा केला आहे. लाेकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरला. या पार्श्वभूमीवर समाजातील राजकीय, सामाजिक, कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर लढायचे की पाडायचे याचा निर्णय घेण्यासाठी रविवारी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती.

जिथे आपली ताकद आहे, अशा मतदारसंघात उमेदवार उभे करायचे. आपल्या ताकदीचे गणित पाहणे गरजेचे आहे. समीकरण जुळवणे महत्त्वाचे आहे. मी समीकरण जुळवतोय. नाही जुळले तर अवघड आहे, असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. एखादी गाडी चांगली असते परंतु, ड्रायव्हर गाडी नीट चालवित नाही आणि ती झाडावर धडकते तशी स्थिती भाजपची आहे. भाजप चांगली आहे, परंतु चालविणारा चांगला नाही, असे म्हणत जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. विविध मुद्द्यांवरून जरांगे-पाटील यांनी या बैठकीत फडणवीस यांच्यावर धारदार टीका केली.चौकट

कोणी अर्ज मागे घ्यायचा हे २९ तारखेला सांगूनिवडणुकीसाठी मागणी करणारे अनेक जण आहेत. सर्वांनी अर्ज भरावेत. यादरम्यान सर्व बाबींचा अभ्यास केला जाईल आणि २९ तारेखला कोणी अर्ज मागे घ्यायचा हे सांगितलं जाईल. ज्यांची नावे जाहीर होतील त्यांच्या मागे समाजाने राहावे, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले. राजकारणात जाण्याची इच्छा नसताना त्यांनी मला यात ओढलं आहे. त्यामुळे समाजाची एकजूट ठेवा.

हात वर करून निर्णयया बैठकीत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला हात वर करून निवडणुकीमध्ये उमेदवार उतरायचे की नाही, असा प्रश्न विचारला आणि समोरच्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले. त्यानंतर जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील