शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

विधानसभेसाठी इच्छुकांनी अर्ज भरा, २९ तारखेला कोणाला पाठिंबा देयचा हे सांगू: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:04 IST

लढायचं, समविचारींना पाठिंबा अन् पाडायचंही; तिहेरी सूत्रांमुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही चिंता वाढणार

वडीगोद्री (जि.जालना) : विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची मोठी घोषणा रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये केली. मराठ्यांची ताकद असेल त्याठिकाणी उमेदवार देणार, राखीव जागांवर आपल्या विचारांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, जिथे ताकद नसेल अशा ठिकाणी आपल्या मागण्या मान्य असल्याचे जो उमेदवार ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून देईल, त्याला पाठिंबा देणार, अशी तिहेरी सूत्र सांगणारी भूमिका जरांगे पाटील यांनी शेकडो कार्यकर्ते आणि इच्छुकांच्या उपस्थितीत जाहीर केली. तसेच निवडणुकीसाठी मागणी करणारे अनेक जण आहेत. सर्वांनी अर्ज भरावेत. यादरम्यान सर्व बाबींचा अभ्यास केला जाईल आणि २९ तारेखला कोणी अर्ज मागे घ्यायचा हे सांगितलं जाईल.  ज्यांची नावे जाहीर होतील त्यांच्या मागे समाजाने राहावे, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.

जरांगे पाटील यांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे महायुतीची विशेषत: भाजप आणि विरोधी बाकावर बसणाऱ्या मविआच्या नेत्यांचीही चिंता वाढणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, दाखल गुन्हे मागे घ्यावेत, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मागील दीड वर्षापासून लढा उभा केला आहे. लाेकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरला. या पार्श्वभूमीवर समाजातील राजकीय, सामाजिक, कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर लढायचे की पाडायचे याचा निर्णय घेण्यासाठी रविवारी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती.

जिथे आपली ताकद आहे, अशा मतदारसंघात उमेदवार उभे करायचे. आपल्या ताकदीचे गणित पाहणे गरजेचे आहे. समीकरण जुळवणे महत्त्वाचे आहे. मी समीकरण जुळवतोय. नाही जुळले तर अवघड आहे, असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. एखादी गाडी चांगली असते परंतु, ड्रायव्हर गाडी नीट चालवित नाही आणि ती झाडावर धडकते तशी स्थिती भाजपची आहे. भाजप चांगली आहे, परंतु चालविणारा चांगला नाही, असे म्हणत जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. विविध मुद्द्यांवरून जरांगे-पाटील यांनी या बैठकीत फडणवीस यांच्यावर धारदार टीका केली.चौकट

कोणी अर्ज मागे घ्यायचा हे २९ तारखेला सांगूनिवडणुकीसाठी मागणी करणारे अनेक जण आहेत. सर्वांनी अर्ज भरावेत. यादरम्यान सर्व बाबींचा अभ्यास केला जाईल आणि २९ तारेखला कोणी अर्ज मागे घ्यायचा हे सांगितलं जाईल. ज्यांची नावे जाहीर होतील त्यांच्या मागे समाजाने राहावे, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले. राजकारणात जाण्याची इच्छा नसताना त्यांनी मला यात ओढलं आहे. त्यामुळे समाजाची एकजूट ठेवा.

हात वर करून निर्णयया बैठकीत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला हात वर करून निवडणुकीमध्ये उमेदवार उतरायचे की नाही, असा प्रश्न विचारला आणि समोरच्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले. त्यानंतर जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील