शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
4
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
5
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
6
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
7
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
8
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
9
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
10
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
11
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
12
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
13
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
14
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
15
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
16
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
17
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
18
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
19
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
20
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!

झाले मरण स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:28 IST

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्क‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’, ‘वाहने सावकाश चालवा’, ‘मद्यपान करून वाहने चालवू नका’, ‘अति घाई, संकटात नेई’ यासारखे फलक सर्वत्र दिसतात. परंतु ते केवळ शोभेचे बाहुले बनल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षात जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर तब्बल ६०३ अपघात झाले असून यामध्ये ३२९ ...

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्क‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’, ‘वाहने सावकाश चालवा’, ‘मद्यपान करून वाहने चालवू नका’, ‘अति घाई, संकटात नेई’ यासारखे फलक सर्वत्र दिसतात. परंतु ते केवळ शोभेचे बाहुले बनल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षात जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर तब्बल ६०३ अपघात झाले असून यामध्ये ३२९ लोकांना प्राण गमवावे लागले आहे. तर ५७३ लोक गंभीर जखमी झाले आहेत. सरासरीनुसार जिल्ह्यात दिवसाला एक अपघात, तर ३ दिवसाला एक व्यक्ती ठार होत असल्याचे दिसून येते. खराब रस्ते, नियमांचे पालन न करणे, मद्यपान, निष्काळजीपणा, अति घाई हे मुद्दे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. आकडेवारीवरून ‘मरण झाले स्वस्त’ म्हणण्याची वेळ आली आहे.ध्या जालना जिल्ह्यात दिवसेंदिवस महामार्गावरील अपघातांची संख्या वाढत चालली आहे. विस्कळीत वाहतूक व्यवस्था, नियमांचे पालन न करणे यासारखी कारणे अपघातास निमंत्रण देत आहेत. जिल्ह्यातून पाच राज्य महामार्ग जातात. यामध्ये औरंगाबाद-जालना, जालना -नांदेड, जालना - देऊळगावराजा, जालना-सिंदखेड राजा, जालना - अंबड यांचा समावेश आहे. यातील जालना-अंबड महामार्ग खूपच अरूंद आहे. त्यातच या मार्गावरून ट्रकसारख्या मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर कोंडीसह अपघात जास्त होतात. याच मार्गावर जास्त अपघाताची नोंद असल्याचेही सूत्रां कडून सांगण्यात आले.दरम्यान, जिल्हा पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून वेळोवेळी रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते. या माध्यमातून नियमांचे पालनासंदर्भात आवाहन केले जाते. तसेच मार्गदर्शनही केले जाते. परंतु प्रशासनाकडूनही कागदोपत्रीच घोडे नाचविले जात असल्याने वाहन धारकांपर्यंत जनजागृती खºया अर्थाने पोहोचत नाही. याचा परिणामही अपघातांवर होत आहे.अंबड रोडवर सर्वाधिक अपघातगेल्या अनेक वर्षांपासून चौपदरीकरण न झाल्यामुळे अंबड रस्त्यावर दररोज छोटे मोठे अपघात होतात. रस्त्यावरुन दररोज हजारो वाहने धावतात. त्यातच दुहेरी वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहे. या अपघातात अनेकांना आपले प्राणही गमावावे लागले. या रस्त्याच्या चौपदरी करणाची अनेक दिवसापासून मागणी केली जात आहे. परंतु, याकडे प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही.रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातजालना शहरातील मुख्ये रस्ते काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आले आहेत. हे रस्ते झाल्यामुळे अपघात कमी होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, अद्यापही अपघात कमी झाले नसून छोटे-मोठे अपघात घडतच आहेत. शहरात वाहतुकींच्या नियमाचे पालन न करणे, सिग्नल नसणे ही कारणेही वाहतूक कोंडी आणि अपघातास कारणीभूत ठरत आहेत.भरधाव वेगही कारणीभूत‘अति घाई संकटात नेई’ असे घोषफलक रस्त्याच्या कडेला दिसतात. परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष नसते. भरधाव वाहन असताना अचानक कुत्रे-मांजर अन्य कोणीतरी आडवे येते आणि अचानक ब्रेक दाबल्यानंतर वाहन उलटून जीव जातो. असे अपघात झाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कोट्यवधी रूपये खर्चूनही रस्ते ‘जैसे थे’जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अपयश आले आहे. केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम बांधकाम विभागाकडून केले जात आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही रस्ते जैसे थे च आहेत. अरुंद व खड्डेमय रस्त्यांमुळेच अपघात होत असल्याचे समोर आले असून, अशा अपघातास बांधकाम विभागच जबाबदार असल्याचे सदरील परिस्थितीवरुन दिसते.अल्पवयीन वाहन चालक सुसाटजिल्हाभरात अल्पवयीन वाहन चालकांचा सुळसुळाट आहे. परवाना नसतानाही भरधाव वाहने चालवितात. वाहन चालविण्यासाठी त्यांची शारीरिक व बौद्धिक क्षमता नसते. पाल्यांच्या हट्टापायी त्यांच्या हाती वाहनाची चावी दिली जाते. आणि हेच त्यांच्या अंगलट आल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अशी अनेक उदाहरणे दिसून येतात.

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी