शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

६२ शेतकरी करणार मत्स्यपालनाचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 12:32 AM

६२ शेतकऱ्यांना शेततळ््यातील मत्स्यपालनाचे प्रशिक्षण रायगड जिल्ह्यातील कोकण येथे नुकतेच देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवेळी पडणारा पाऊस. निसर्गाची शेतीवर होणारी अवकृपा. यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे. शेतीला पूरक व्यवसाय केल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक विस्कटलेली घडी नीट बसणार नाही. हीच बाब हेरून जिल्हा कृषी कार्यालायातील कृषी तंत्रणान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्ह्यातील ६२ शेतकऱ्यांना शेततळ््यातील मत्स्यपालनाचे प्रशिक्षण रायगड जिल्ह्यातील कोकण येथे नुकतेच देण्यातआले.हे प्रशिक्षण आत्माचे प्रकल्प संचालक बाळासाहेब शिंदे, उपसंचालक अनिरुद्ध मगर यांच्या मार्गदर्शनाखाली २१ ते २३ आॅगस्ट व २६ ते २८ आॅगस्ट या दोन टप्प्यामध्ये देण्यात आले. यात जिल्ह्यातील ६२ शेतकरी व ३ आत्माचे कर्मचारी उपस्थित होते. यात गोड्या पाण्यात मत्स्यपालन कसे करावे, माशांची काळजी कशी घ्यावी, मत्स्य खाद्य तयार करणे, मत्स्य बीज बनविणे, मास्यांवर येणा-या विविध रोगांची ओळख करून त्यावर उपाय कशे करावेत आदी. विषयांवर शेतक-यांना प्रशिक्षण देण्यातआले. कार्यक्रम यशस्वितेसाठी आत्माचे दत्तात्रय सूर्यवंशी, धैर्यशील पाटील, सचिन राठोड आदींनी प्रयत्न केले.शेतक-यांनी बांधली ८२५९ शेततळीजिल्ह्यातील जालना, भोकरदन, बदनापूर, अंबड, मंठा, घनसावंगी, परतूर आणि जाफराबाद या तालुक्यातील शेतक-यांनी मागेल त्याला शेततळी या योजनेअंतर्गत ८२५९ शेततळी बांधली आहेत. यातील असंख्य शेततळ््यांचे अस्तरीकरण देखील झालेले आहे. पाणी उपलब्ध असलेल्या शेततळ््यांत प्रशिक्षणार्थींना आता कटला, मृगल, रोहू आदी माशांचे मस्यपालन करता येणार आहे. परिणामी शेतक-यांच्या उत्पनात दुपटीने वाढ होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र