शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १२३२ जागांसाठी ६ हजार जणांनी अर्ज दाखल केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:30 IST

गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. एकूणच जालना जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींसाठी ...

गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. एकूणच जालना जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या निवडणुकीत वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून अनेकवेळा स्वपक्षाचेच कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे असतात. या निवडणुका पक्ष पातळीवर गंभीरतेने घेतल्या जातात. कुठल्या पक्षाच्या ताब्यात ही ग्रामपंचायत आहे. त्यानुसार तो राजकीय पक्ष ग्रामीण भागात रूजला आहे की, नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे मोठ्या नेत्यांपासून ते अत्यंत लहान कार्यकर्त्यालादेखील लक्ष घालावे लागते. जिल्ह्यात खऱ्या अर्थाने या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. प्रत्यक्ष या निवडणुकांची मुदत ही नोव्हेंबरमध्येच संपली आहे. या निवडणुकीत पॅनलच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद असते. त्यामुळे अनेक युवक या निवडणुकीत आपले भविष्य आजमावत आहेत. बुधवारी ऑनलाईन प्रमाणेच ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. यामुळे तहसील कार्यालयांना जत्रेचे स्वरूप आले होते.

१५ जानेवारी रोजी फैसला

निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, आता अर्ज छाननीकडे लक्ष लागले आहे. क्षुल्लक कारणामुळे उमेदवारी अर्ज बाद झाल्यास मोठी अडचण येते. त्यामुळे अर्ज भरताना मोठी काळजी घेतली जाते. या निवडणुकांसाठी मतमोजणी १५ जानेवारी रोजी होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.