शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
4
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
5
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
6
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
7
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
8
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
9
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
10
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
11
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
12
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
13
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
14
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
15
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
16
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
17
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
18
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
19
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
20
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

जिल्ह्यात १२३२ जागांसाठी ६ हजार जणांनी अर्ज दाखल केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:30 IST

गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. एकूणच जालना जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींसाठी ...

गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. एकूणच जालना जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या निवडणुकीत वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून अनेकवेळा स्वपक्षाचेच कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे असतात. या निवडणुका पक्ष पातळीवर गंभीरतेने घेतल्या जातात. कुठल्या पक्षाच्या ताब्यात ही ग्रामपंचायत आहे. त्यानुसार तो राजकीय पक्ष ग्रामीण भागात रूजला आहे की, नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे मोठ्या नेत्यांपासून ते अत्यंत लहान कार्यकर्त्यालादेखील लक्ष घालावे लागते. जिल्ह्यात खऱ्या अर्थाने या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. प्रत्यक्ष या निवडणुकांची मुदत ही नोव्हेंबरमध्येच संपली आहे. या निवडणुकीत पॅनलच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद असते. त्यामुळे अनेक युवक या निवडणुकीत आपले भविष्य आजमावत आहेत. बुधवारी ऑनलाईन प्रमाणेच ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. यामुळे तहसील कार्यालयांना जत्रेचे स्वरूप आले होते.

१५ जानेवारी रोजी फैसला

निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, आता अर्ज छाननीकडे लक्ष लागले आहे. क्षुल्लक कारणामुळे उमेदवारी अर्ज बाद झाल्यास मोठी अडचण येते. त्यामुळे अर्ज भरताना मोठी काळजी घेतली जाते. या निवडणुकांसाठी मतमोजणी १५ जानेवारी रोजी होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.