शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वर्षभरात ४२९ जणांचे जुळले नव्याने संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:21 IST

महिला तक्रार निवारण केंद्रात गेलेल्या ६८० जोडप्यांपैकी ४२९ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात जालना पोलिसांना यश आले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घरातील किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून पती-पत्नी घटस्फोटापर्यंत जातात; परंतु हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी महिला तक्रार निवारण केंद्रात गेलेल्या ६८० जोडप्यांपैकी ४२९ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात जालना पोलिसांना यश आले आहे. मोबाईलवरील संभाषण मॅसेज, संशय अशी विविध किरकोळ कारणे, घरातील पती-पत्नीच्या वादासाठी कारणीभूत ठरत आहेत.१९९६ पासून जालना पोलिसांच्या वतीने महिला तक्रार निवारण केंद्र तालुका जालना पोलीस ठाण्याच्या बाजूच्या इमारतीमध्ये सुरु झाले. सुरुवातीला जनजागृती व माहितीचा अभाव असल्याने तक्रारींची संख्या खूपच कमी होती. १९९६ साली ३५ अर्ज आले होते. पैकी २६ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात तक्रार निवारण केंद्राला यश आले. त्यानंतर ही कामगिरी वृद्धिंगत होत गेली. एकाने दुसऱ्याला, दुस-याने तिस-याला सांगत गेल्याने आज तक्रारींचा आकडा ६०० वर गेला आहे. हाच धागा पकडून पती-पत्नींमध्ये कोणत्या कारणावरुन वाद होतात याचा आढावा शनिवारी ‘लोकमत’ने घेतला. यावेळी संशय, मोबाईल व ईगो या कारणावरुन सर्वात जास्त भांडणे होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. असे असले तरी दोघांना बोलावून घेत त्यांचे समुपदेशन करीत पुढे निर्माण होणा-या दुष्परिणामांची जाणीव करुन दिली जाते. या समुपदेशनामुळे २०१८ या वर्षात तब्बल ४२९ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात यश मिळवले आहे. हा आकडा कौतूकास्पद असल्याचे सांगण्यात आले.असे होते समुपदेशनसुरुवातीला पीडितेची तक्रार तिच्या हस्ताक्षरात घेतली जाते. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला महिला तक्रार निवारण केंद्रातून संबंधित पोलीस ठाण्यातर्फे नोटीस पाठविली जाते. ठरलेल्या तारखेस हजर राहण्यास सांगितले जाते. दोघांनाही समोरासमोर आणून त्यांची अडचण जाणून घेतली जाते. त्यानंतर त्यावर मार्ग काढण्यासाठी समुपदेशन केले जाते. त्यांना कायद्याचे मार्गदर्शन केले जाते.वाईट परिणामांची जाणीव करुन दिली जाते. वारंवार तारीख देऊन त्यांचे मनपरितर्वन करण्याचा प्रयत्न होतो. तरीही प्रकरण मिटले नाही तरी संबंधित पोलीस ठाण्याला पत्र पाठवून समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले. स्थानिक पोलीस निरीक्षकांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठविले जाते.

टॅग्स :Divorceघटस्फोटmarriageलग्नPoliceपोलिसFamilyपरिवार