शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

३६५ गावांची टँकरवर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:32 AM

वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ३६५ गावे आणि ७३ वाड्यांसाठी तब्बल ४२२ टँकरला मंजुरी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाण्याची टंचाईही वाढू लागली आहे़ वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ३६५ गावे आणि ७३ वाड्यांसाठी तब्बल ४२२ टँकरला मंजुरी दिली आहे़ तर ५८० विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे़पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून, शहरी भागातील नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे़ टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायत स्तरावरून येणाऱ्या प्रस्तावांना प्रशासनाकडून मंजुरी देण्यात येत आहे़सध्या जिल्ह्यातील ३६५ गावे आणि ७३ वाड्यांसाठी ४२२ टँकरना मंजुरी देण्यात आली आहे़ यात जालना तालुक्यातील २७ गावांसाठी ५० टँकर, बदनापूर तालुक्यातील ५२ गावांसाठी ६१ टँकर, भोकरदन तालुक्यातील ८१ गावांसाठी ९२ टँकर, जाफराबाद तालुक्यातील ५३ गावांसाठी ५७ टँकर, परतूर तालुक्यातील १८ गावांसाठी १८ टँकर, मंठा तालुक्यातील ३१ गावांसाठी ३२ टँकर, घनसावंगी तालुक्यातील ४४ गावांसाठी ४४ टँकर तर अंबड तालुक्यातील ५९ गावांसाठी ६६ टँकर सुरू करण्यात आले आहेत़. टँकरची संख्या भविष्यात सातशेपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.भोकरदन तालुक्यात सर्वाधिक टँकरभोकरदन तालुक्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भोकरदन तालुक्यात ९२, जालना ५०, बदनापूर ६१, जाफराबाद ५७, परतूर १८, मंठा ३१, अंबड ६६, घनसावंगी तालुक्यात ४४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.नियोजन सुरू- गोरंट्यालघाणेवाडी तलाव आटल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये. जायकवाडी धरणातून जास्तीचे पाणी पुरविण्याचे नियोजन सुरू असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले.

टॅग्स :water transportजलवाहतूकwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ