शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

२५७ कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST

जालना : आगामी २०२१-२२ वर्षाचा विकास आराखडा शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. या बैठकीत २५७ कोटी ...

जालना : आगामी २०२१-२२ वर्षाचा विकास आराखडा शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. या बैठकीत २५७ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांच्या प्रारूप विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जिल्ह्याच्या विकास आराखड्याच्या निधीत आणखी भरीव वाढ करून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, त्यात मोठ्या रकमेचे नियोजन करून घेऊ, असेही टोपे म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आ. बबनराव लोणीकर, आ. कैलास गोरंट्याल, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, आ. राजेश राठोड, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी वरील माहिती दिली.

.....

काेणत्या विभागाला किती निधी...

प्रारूप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत १८१ कोटी १३ लाख रुपये.

जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत ७३ कोटी ९६ लाख आणि जिल्हा वार्षिक योजना (ओटीएसपी) अंतर्गत २ कोटी २५ लाख ९१ हजार रुपये अशा वित्तीय तरतुदीचा आराखडा मंजूर करण्यात आला.

यामध्ये कृषी व संलग्न सेवासाठी १६ कोटी ९५ लाख ३६ हजार, ग्रामीण विकासासाठी १० कोटी, विद्युत, ऊर्जा विकाससाठी ९ कोटी ६१ लक्ष ९० हजार, सामान्य आर्थिक विकासासाठी ५ कोटी २ लाख १६ हजार व सामाजिक व सामूहिक सेवा यासाठी ७२ कोटी ४२ लाख.

.....

निधी अखर्चित राहिल्यास कारवाई

कोविडच्या अनुषंगाने यावर्षी केवळ ३३ टक्केच निधी खर्च करण्यात आला. निधी खर्च करण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून यंत्रणांना वितरित करण्यात आलेला निधी संपूर्णपणे खर्च होईल, याची दक्षता घेण्यात येईल. प्राप्त निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करण्यात यावा. ज्या विभागाचा निधी अखर्चित राहील, त्यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी सांगितले.

.....

...तर संबंधित एजन्सीकडून रस्ते करून घ्या

नियोजन समितीच्या बैठकीत रस्त्यांसाठी १८ कोटी रुपये ठेवले आहेत. सध्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. समृद्धी महामार्ग, इतर मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू असल्याने वाळू, सिमेंट व इतर साहित्याची मोठी वाहने रस्त्यांवरून जातात. त्यामुळे रस्ते खराब होतात. ज्या एजन्सीच्या कामामुळे रस्ते खराब झाले, त्याच एजन्सीकडून रस्ते तयार करून घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

......

जालना पालिकेच्या पाणीपुरवठ्याचे वीजबिल शून्यावर येणार

जालना नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे वीजबिल शून्यावर आणण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एक मेगावॅटचा प्रकल्प मेढाच्या माध्यमातून उभारण्यात येईल. त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. या प्रकल्पाची वीज महावितरणला दिली जाईल, जेणेकरून जालना नगरपालिकेला पाणीपुरवठ्याचे बिल शून्य येईल, असेही टोपे म्हणाले.