शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात १९ हजार नवे मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST

चाेरट्यांसह हायवा पोलिसांच्या ताब्यात जालना : जाफराबाद येथून चोरीला गेलेला हायवा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधून काढला. हायवा पळविणारे ...

चाेरट्यांसह हायवा पोलिसांच्या ताब्यात

जालना : जाफराबाद येथून चोरीला गेलेला हायवा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधून काढला. हायवा पळविणारे शेख समीर शेख रज्जाक, शेख फारूख, ब्रह्मा किसन गिरी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

जवखेडा शाळेत जनजागृतीपर कार्यक्रम

केदारखेडा : जागतिक कर्करोग दिनानिमित्त जवखेडा येथील जल्हा परिषद शाळेत ‘तंबाखुमुक्त शाळा अभियान’ राबविण्यात आले. जनजागृतीपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विठ्ठलराव घायाळ, तर प्रमुख पाहुणे म्हणून डी.एस. घोरपडे, पी. व्ही. मिसाळ, ए. बी. काशीद उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी सुमेध शिंगणे यांने तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याबाबत भाषण केले. सूत्रसंचालन एम. एस. शिंगणे यांनी केले. पी. आर. ठोंबरे यांनी आभार मानले.

पालिकेने राबविली स्वच्छता मोहीम

परतूर : परतूर नगर परिषदेच्यावतीने शहरातील आदर्श कॉलनी भागात स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी रस्ते, नाल्यांची साफसफाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. मोहिमेनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टायर फुटल्याने

कारचा अपघात

वालसावंगी : टायर फुटल्याने कारचा अपघात झाल्याची घटना सुंदरवाडी ते वाडोना रस्त्यावर घडली. रवींद. जैस्वाल हे आपल्या कुटुंबासह गावी जात होते. तेव्हा टायर फुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात कुणालाही इजा पोहोचली नाही.

आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

बदनापूर : जालना-औरंगाबाद रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या मागणीसाठी किसान करणी सेना युवा युवामोर्चाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु बदनापूर नगरपंचायतीने अतिक्रमण हटविण्याचे लेखी दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष जयसिंग राजपूत व तालुकाध्यक्ष अरुण खोकड यांनी सांगितले.

वाहन चालविताना खबरदारी घ्यावी

जालना : राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक कार्यालयाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी वाहन चालविताना खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे अध्यक्ष दिलीप शिंदे, वाहन निरीक्षक सचिन झाडबुके, हनुमंत सुळे, उदय साळुंखे, सुभाष डिघे उपस्थित हेाते.

अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तळीरामांमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, भांडण तंट्यातही वाढ होत आहे. शिवाय युवा पिढीही व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

बदलत्या वातावरणामुळे रब्बीतील पिके धोक्यात

जालना : वातावरणातील सततच्या बदलामुळे रब्बीतील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. फळपिकांनाही या वातावरणाचा फटका बसत आहे. रोगराई दूर व्हावी, यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत.