शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

५ राफेल असो अथवा ५००, आम्ही तयार; पाक मेजरची भारताला पोकळ धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 2:49 PM

पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी सांगितले की, भारताकडे राफेल असो वा एस ४००..कोणत्याही आक्रमणाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य पूर्णपणे तयारीत आहे.

ठळक मुद्देभारताच्या वाढता लष्करी खर्च आणि संरक्षण बजेटबद्दल पाकिस्तान चिंताग्रस्त पाच राफेल खरेदी केले किंवा ५०० याची पर्वा करत नाहीभारतावर वंशवाद आणि जातीयवाद पसरवल्याचा आरोपही केला

नवी दिल्ली -  अलीकडेच भारताने फ्रान्सकडून घेतलेले राफेल विमान देशात पोहचले आहेत. त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, राफेल भारतात आल्याची चिंता त्या देशांना वाटली पाहिजे जे भारताच्या अखंडतेला आव्हान देण्याचं काम करतात. गुरुवारी पाकिस्तानी सेनेने सांगितलं की भारताने ५ राफेल आणू द्या अथवा ५०० आम्हाला फरक पडत नाही, आम्ही तयार आहोत असं म्हटलं.

पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी सांगितले की, भारताकडे राफेल असो वा एस ४००..कोणत्याही आक्रमणाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य पूर्णपणे तयारीत आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यात त्यांना राफेल, भारताचं वाढते सुरक्षा बजेट, काश्मीर, सीमोल्लंघन आणि पाक-सौदी अरबच्या संबधांवर पत्रकारांनी प्रश्न विचारले होते. यात मेजर जनरल इफ्तिखार म्हणाले, भारताच्या वाढता लष्करी खर्च आणि संरक्षण बजेटबद्दल पाकिस्तान चिंताग्रस्त आहे, पण कोणत्याही प्रकारच्या आक्रमणासाठी तयार आहे.

राफेलमुळे पाकिस्तानला निर्माण झालेल्या धोक्याशी संबंधित प्रश्नावर मेजर जनरल इफ्तिखार म्हणाले, सैन्यावर भारत जगात सर्वाधिक खर्च करीत आहे. तो शस्त्रांच्या शर्यतीत सहभाही आहे. मात्र फ्रान्स ते भारत यामध्ये पाच मार्गांचा प्रवास ज्या प्रकारे झाला होता त्यावरून त्यांची असुरक्षितता दिसून येते. त्यांनी पाच राफेल खरेदी केले किंवा ५०० याची पर्वा करत नाही, आम्ही तयार आहोत आणि आम्हाला आमच्या क्षमतेविषयी शंका नाही. राफेल येण्याने काही फरक पडणार नाही असं त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मेजर जनरल इफ्तिखार यांनीही पाकिस्तानच्या ढासळत्या आणि भारताच्या वाढत्या संरक्षण अर्थसंकल्पाबद्दल चिंता व्यक्त केली.

आमच्या तुलनेत भारताचा संरक्षण खर्च आणि अर्थसंकल्प हा पारंपारिक समतोलच्या विरुद्ध आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही याकडे लक्ष दिले पाहिजे. पाकिस्तानमधील बरेच लोक म्हणतात की, पाकिस्तानचे संरक्षण बजेट खूप जास्त आहे. यावेळी आम्ही बजेटचा १७ टक्के हिस्सा सैन्य, नौदल आणि हवाई दलावर खर्च करीत आहोत. आणि गेल्या १० वर्षांत पाकिस्तानचा संरक्षण खर्च सातत्याने कमी होत आहे. असे असूनही आमच्या क्षमता कमी झाल्या नाहीत. त्यामुळे राफेल आणू द्या किंवा एस -४०० आमची तयारी पूर्ण आहे असं मेजर जनरल इफ्तिखार यांनी सांगितले.

काश्मीरवर निशाणा

मेजर जनरल इफ्तिखार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना काश्मीरवरुन भारताला लक्ष्य केले. भारत नियोजित पद्धतीने या प्रदेशातील लोकसंख्या बदलून तेथील स्थानिक मुस्लिमांना हटवायचे आहे. असा कोणताही छळ काश्मिरींनी अनुभवलेले नाही. तरुण शहीद होत आहेत आणि त्यांना दहशतवादाच्या नावाखाली पुरण्यात आले आहे. भारतीय सैन्याने कश्मीरींना पेलेट गनने लक्ष्य केले आहे. यावेळी स्थानिक नेतृत्वाला एका वर्षासाठी कोठडीत ठेवण्यात आले आहे. काश्मिरींचा प्रश्न संपूर्ण जगासमोर ठेवण्यात पाकिस्तानने कसलीही कसर सोडली नाही असं इफ्तिखार यांनी सांगितले.

सीमेवरील शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचा आरोप

कोरोना महामारीदरम्यान संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीसांचे आवाहन असूनही भारताने पारंपारिक भ्याड कृत्ये सुरूच ठेवली आणि निरपराध लोकांना लक्ष्य केले. जड शस्त्रे देखील वापरली जातात. सीमा उल्लंघनाला पाकिस्तानी सैन्य देखील प्रभावीपणे उत्तर देत आहे. त्यांनी भारतावर वंशवाद आणि जातीयवाद पसरवल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की, जातीय द्वेषाची आग पेटवण्यास भारताने सुरुवात केली आणि ती देशभर पसरली असं ते म्हणाले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर