शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

ब्रिटनच्या अनिवासी भारतीय गृहमंत्र्यांनीच भारताविरोधात मोर्चा उघडला; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 4:35 PM

ब्रिटनमध्ये नवीन सरकार आले आहे. कंजर्वेटिव पक्षाचे वार्षिक संमेलन होते, यात नव्या पंतप्रधानांनी एफटीएवर या महिन्याच्या अखेरीस सह्या करून पूर्णत्वास नेले जाईल असे म्हटले होते.

ब्रिटनच्या नव्या गृहमंत्री आणि अनिवासी भारतीय असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांनी भारताविरोधातच मोर्चा उघडला आहे. भारत-ब्रिटनमधील मुक्त व्यापार समझोत्याला विरोध केला आहे. यामुळे ब्रिटनमध्ये भारतीयांची गर्दी वाढू लागेल, असा त्यांचा दावा आहे. 

ब्रिटनमध्ये नवीन सरकार आले आहे. कंजर्वेटिव पक्षाचे वार्षिक संमेलन होते, यात नव्या पंतप्रधानांनी एफटीएवर या महिन्याच्या अखेरीस सह्या करून पूर्णत्वास नेले जाईल असे म्हटले होते. यानंतर लगेचच त्यांच्या भारतातूनच ब्रिटनमध्ये गेलेल्या व गृहमंत्री झालेल्या  ब्रेव्हरमन यांनी याविरोधात वक्तव्य केले आहे. त्या लिज ट्रस यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. भारत सरकार दीर्घकाळापासून भारतीय नागरिकांना ब्रिटनमध्ये काम करण्यासाठी आणि स्टडी व्हिसा वाढविण्याची मागणी करत आला आहे. या करारामुळे भारतीयांना ब्रिटनमध्ये एन्ट्री सोपी होऊ शकते. परंतू, आधीच ब्रिटनमध्ये जाऊन वसलेल्या या सुएला ब्रेव्हरमन यांनी याला विरोध केला आहे. 

ब्रिटीश मासिक 'द स्पेक्टेटर'ला दिलेल्या मुलाखतीत ब्रेव्हरमन म्हणाल्या की, व्हिसा संपला तरी ब्रिटनमध्ये जास्त काळ राहणाऱ्यांच्या यादीत भारतीयांचाच जास्त भरणा आहे. माजी गृहमंत्री प्रिती पटेल यांनी गेल्या वर्षी भारतासोबत हा करार केला होता, त्यामुळे बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे तसेच व्हिसा संपला तरी लोक ब्रिटनमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे.

यूकेच्या गृह मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 2020 मध्ये 20,706 भारतीय इतर देशांच्या नागरिकांपेक्षा जास्त दिवस राहिले. 2020 मध्ये ज्या 473,600 भारतीयांचा व्हिसा 12 महिन्यांच्या आत संपणार होता, त्यापैकी 4,52,894 लोकांनी यूके सोडले, परंतु 4.4 टक्के लोक तिथेच राहिले. भारतीयांसाठी ब्रिटनची सीमा खुली करण्याच्या या धोरणाबाबत मी खूप चिंतित आहे, यासाठीच लोकांनी ब्रेक्झिटला मतदान केलेले नाहीय, असे त्या म्हणाल्या.  

टॅग्स :Englandइंग्लंड