शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Pakistan Train Crash: पाकिस्तानात दोन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात, 10 ठार अन् 50 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 13:23 IST

या रेल्वे अपघातात अकबर एक्सप्रेसचे इंजिन पूर्णत: नष्ट झाले असून तीन बोग्यांचेही नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देया रेल्वे अपघातात अकबर एक्सप्रेसचे इंजिन पूर्णत: नष्ट झाले असून तीन बोग्यांचेही नुकसान झाले आहे.या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी असल्याची माहिती आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पूर्व पंजाब प्रांतात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी असल्याची माहिती आहे. सादिकबाद तहसील क्षेत्रातील वल्हार रेल्वे स्थानकावर एका मालगाडी अकबर एक्सप्रेसने धडक दिली. मृतांमध्ये 9 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधिकारी रहिम यार खान उमर सलामत यांनी याबाबत माहिती दिली.

या रेल्वे अपघातात अकबर एक्सप्रेसचे इंजिन पूर्णत: नष्ट झाले असून तीन बोग्यांचेही नुकसान झाले आहे. अपघातातील जखमींना सादिकबाद आणि रहिम यार खान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना मदतकार्य आणि रेल्वेगाडीतील मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे डीओपी सलामत यांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान इम्रान खान आणि राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही दु:ख व्यक्त करत मृतांना आदरांजली वाहिली. तसेच इम्रान खान यांनी रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांच्याशी संपर्क साधून आपत्कालीन परिस्थितीवर तातडीने काम करण्याचे सांगितले आहे. तर, रेल्वे मंत्र्यांनीही या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAccidentअपघातDeathमृत्यूImran Khanइम्रान खान