शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 11:32 IST

India Pakistan Conflict: भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान नवीन योजना आखत आहे.

India Pakistan Conflict: भारताच्या लष्कराने पाकिस्तानचे मोठे नुकसान केल्यानंतर भारत सरकार आता 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढविण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे, हे ठसवण्यासाठी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी जगातील प्रमुख ७-८ देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळे पाठविण्याची केंद्रातील मोदी सरकारची योजना आहे. भारताच्या या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान नवीन योजना आखत आहे. पाकिस्तानातून आता जगभरातील अनेक देशांमध्ये शांतीदूतांचे प्रतिनिधीमंडळ जाणार असल्याचे समजते. 

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी शनिवारी सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दोन्ही देशांमधील अलीकडच्या तणावाच्या वाढत्या प्रकरणावर पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याचे काम माझ्यावर सोपवले आहे. दुसरीकडे, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत प्रत्युत्तर दिले. परंतु, यानंतर पाकिस्तानने भारतीय नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत ड्रोन हल्ले केले. यामुळे दहशतवादाला आळा घालण्यात अपयश आणि भारतीय नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या कारवायांमुळे पाकिस्तानची विश्वासार्हता जागतिक स्तरावर ढासळली आहे. अशातच बिलावल भुट्टो झरदारी यांच्या शिष्टमंडळाला कठीण संघर्षाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानची सेवा करण्यासाठी वचनबद्ध राहण्याचा सन्मान 

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची विनंती मला केली. ही जबाबदारी स्वीकारण्याचा आणि या आव्हानात्मक काळात पाकिस्तानची सेवा करण्यासाठी वचनबद्ध राहण्याचा मला सन्मान वाटतो, असे झरदारी यांनी आपल्या फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. अनेकदा फसवे दावे आणि खोटी माहिती पसरवणारा पाकिस्तान जगासमोर नेमके काय सांगणार, याकडे भारताचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे आणण्यासाठी भारत सरकारकडून विविध देशांमध्ये पाठविल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांची यादी तयार केली आहे. या शिष्टमंडळांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी काँग्रेसचे खासदार शशी थरूर, भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिंदेसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, जनता दल (यू)चे संजयकुमार झा आणि द्रमुक नेत्या कनिमोझी करुणानिधी यांच्या खांद्यावर टाकली आहे. या सात शिष्टमंडळामध्ये चार नेते सत्ताधारी एनडीएमधील असून तीन इंडिया आघाडीकडून आहेत.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक