शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 11:32 IST

India Pakistan Conflict: भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान नवीन योजना आखत आहे.

India Pakistan Conflict: भारताच्या लष्कराने पाकिस्तानचे मोठे नुकसान केल्यानंतर भारत सरकार आता 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढविण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे, हे ठसवण्यासाठी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी जगातील प्रमुख ७-८ देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळे पाठविण्याची केंद्रातील मोदी सरकारची योजना आहे. भारताच्या या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान नवीन योजना आखत आहे. पाकिस्तानातून आता जगभरातील अनेक देशांमध्ये शांतीदूतांचे प्रतिनिधीमंडळ जाणार असल्याचे समजते. 

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी शनिवारी सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दोन्ही देशांमधील अलीकडच्या तणावाच्या वाढत्या प्रकरणावर पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याचे काम माझ्यावर सोपवले आहे. दुसरीकडे, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत प्रत्युत्तर दिले. परंतु, यानंतर पाकिस्तानने भारतीय नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत ड्रोन हल्ले केले. यामुळे दहशतवादाला आळा घालण्यात अपयश आणि भारतीय नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या कारवायांमुळे पाकिस्तानची विश्वासार्हता जागतिक स्तरावर ढासळली आहे. अशातच बिलावल भुट्टो झरदारी यांच्या शिष्टमंडळाला कठीण संघर्षाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानची सेवा करण्यासाठी वचनबद्ध राहण्याचा सन्मान 

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची विनंती मला केली. ही जबाबदारी स्वीकारण्याचा आणि या आव्हानात्मक काळात पाकिस्तानची सेवा करण्यासाठी वचनबद्ध राहण्याचा मला सन्मान वाटतो, असे झरदारी यांनी आपल्या फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. अनेकदा फसवे दावे आणि खोटी माहिती पसरवणारा पाकिस्तान जगासमोर नेमके काय सांगणार, याकडे भारताचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे आणण्यासाठी भारत सरकारकडून विविध देशांमध्ये पाठविल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांची यादी तयार केली आहे. या शिष्टमंडळांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी काँग्रेसचे खासदार शशी थरूर, भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिंदेसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, जनता दल (यू)चे संजयकुमार झा आणि द्रमुक नेत्या कनिमोझी करुणानिधी यांच्या खांद्यावर टाकली आहे. या सात शिष्टमंडळामध्ये चार नेते सत्ताधारी एनडीएमधील असून तीन इंडिया आघाडीकडून आहेत.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक