शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
5
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
6
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
7
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
8
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
9
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
10
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
11
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
12
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
13
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
14
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
15
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
16
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
17
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
18
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

दोन देशांमध्ये सहकार्य असावं, गटबाजी असू नये; भारत- जपानच्या वाढत्या मैत्रीनं चीनचा तीळपापड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 9:52 AM

भारत आणि जपानमधील वाढत्या मैत्रीमुळे चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

ठळक मुद्दे भारत आणि जपानमधील वाढत्या मैत्रीमुळे चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे. ‘दोन देशांमध्ये सहकार्य असावं, पण गटबाजी असू नये,’ अशी प्रतिक्रिया चीनकडून देण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली आहे.

बीजिंग, दि.15- भारत आणि जपानमधील वाढत्या मैत्रीमुळे चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे. ‘दोन देशांमध्ये सहकार्य असावं, पण गटबाजी असू नये,’ अशी प्रतिक्रिया चीनकडून देण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) या महत्त्वाकांक्षी योजनेला उत्तर म्हणून भारत आणि जपानने फ्रिडम कॉरिडॉरची उभारणी सुरु केल्यानेसुद्धा चीनचा जळफळाट झाला आहे.

भारत आणि जपानमध्ये गुरुवारी १५ सामंजस्य करार झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी हिंदी आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. भारत आणि जपानच्या या वाढत्या मैत्रीमुळे चीनने संताप व्यक्त केला आहे. देशांनी कोणत्याही तणावाविना संवाद साधावा, अशी आमची भूमिका आहे. दोन देशांनी गटबाजी नव्हे, तर सहकार्य करावे,’असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हंटलं आहे. भारत आणि जपानच्या जवळिकीबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना हुआ चुनयिंग यांनी हे उत्तर दिलं आहे. 

जपानकडून भारताला यूएस-२ ही सागरी भागात टेहळणी करणारी विमाने दिली जाणार आहेत. पण या मुद्यावर भाष्य करणं चीनने टाळलं. या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास चिनी प्रवक्त्यांनी नकार दिला. भारताला टेहळणी विमानं देण्याच्या जपानच्या निर्णयामुळे चीनला धक्का बसला आहे. कारण याआधी जपानने कोणत्याही देशासोबत संरक्षण क्षेत्राशी संबंधित वाहनं किंवा सामग्रीच्या विक्रीसाठी करार केलेला नाही. त्यामुळेच जपानच्या या निर्णयामुळे चीनच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जपानच्या सहकार्याने भारतात पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन गुरूवारी नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांनी केलं. मुंबई-अहमदाबादला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनमुळेही चीनची चिंता वाढली असल्याचं चित्र पहायला मिळतं आहे. भारतात हायस्पीड ट्रेन प्रकल्प सुरु करण्यासाठी चीनदेखील उत्सुक आहे. नवी दिल्ली आणि चेन्नई दरम्यान हायस्पीड ट्रेन प्रकल्पासाठी करार करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरु आहेत. चीन आणि जपानमध्ये पूर्व चिनी सुमद्रातील बेटांवरुन मोठा वाद सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर जपानने भारताशी करार केल्याने आणि दोन देशांमधील संबंध आणखी मजबूत झाल्याने चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनIndiaभारत