शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

'एअर स्ट्राईकमध्ये एकाही पाकिस्तानी सैनिकाचा मृत्यू नाही', पाक म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 09:42 IST

भारताने पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर 26 फ्रेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक केला होता

नवी दिल्ली - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या एअर स्ट्राईकबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. बालाकोटच्या कारवाईत एकाही पाकिस्तानी सैन्याचा किंवा नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याचे स्वराज यांनी स्पष्ट केलंय. अहमदाबाद येथे भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना स्वराज यांनी हे बाब स्पष्ट केली. त्यानंतर, पाकिस्तानने यावर प्रतिक्रिया देत, अखेर सत्य समोर आलेच, असे म्हटले आहे.

भारताने पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर 26 फ्रेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक केला होता. जैश ए मोहम्मदकडून 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला आणि स्व-संरक्षणासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केल्याचं भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगितलं आहे. तसेच या कारवाईत कुठल्याही पाकिस्तानी नागरिकांचा आणि सैन्याचा मृत्यू झाला नसल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे. सुषमा स्वराज यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अखेर सत्य समोर आलेच, त्याचप्रमाणे 2016 मधील सर्जिकल स्ट्राईकचे सत्य समोर येईल. तसेच, पाकिस्तानच्या दोन विमानांना पाडण्यात आल्याचे आणि एफ 16 बाबतही लवकरच सत्य बाहेर येईल, असा खोचक टोला पाकिस्तानने लगावला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याचं लक्ष्य केवळ जैश ए मोहम्मदच्या लष्करी तळावर हल्ला करणे हेच होते. त्यामुळेच, या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्य किंवा नागरिक ठार मारला जाणार नाही, याची काळजी भारताने घेतली होती. त्यामुळेच जगभरातील देशांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या कारवाईचं समर्थन केलं आहे. दरम्यान, या मेळाव्यात बोलताना, देशाला बहुमताच्या सरकारची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndian Armyभारतीय जवानSushma Swarajसुषमा स्वराजPakistanपाकिस्तानElectionनिवडणूक