शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 10:46 IST

Asim Munir Threatens India: पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला असून, आमच्या शत्रूने जर तणाव वाढवला तर याचे या भागावर खूप वाईट परिणाम होतील आणि याला जबाबदार केवळ आमचा शत्रू असेल, असे आसिम मुनीर यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी यावर्षी एप्रिल महिन्यात काश्मीरवरून केलेल्या चिथावणीखोर भाषणाची परिणती काश्मीरमधील पहलगाम येथे भीषण दहशतवादी हल्ला होण्यात झाली होती. या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. तसेच भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करून या हल्ल्याचा बदला घेतला होता. दरम्यान, आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला असून, आमच्या शत्रूने जर तणाव वाढवला तर याचे या भागावर खूप वाईट परिणाम होतील आणि याला जबाबदार केवळ आमचा शत्रू असेल, असे आसिम मुनीर यांनी म्हटले आहे.

याआधी एप्रिल महिन्यात आसिम मुनीर याने काश्मीरवरून प्रक्षोभक भाषण करताना काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस असल्याचा दावा केला होता. आता पाकिस्तानी नौदलाच्या पासिंग आऊट परेडमध्ये मुनीर यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळताना  आमच्या शत्रूने जर तणाव वाढवला तर याचे या भागावर खूप वाईट परिणाम होतील आणि याला जबाबदार केवळ आमचा शत्रू असेल, असे म्हटले आहे.

यावेळी आसिम मुनीर याने काश्मीरमधील पाकिस्तानी आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून होणाऱ्या कारवायांना काश्मिरी जनतेची लढाई अशी उपमा दिली. ते म्हणाले की, भारताविरोधात लढत असलेल्या आपल्या काश्मिरी बांधवांनी दिलेल्या बलिदानाची आपण आठवण ठेवली पाहिजे. पाकिस्तान हा संयुक्त राष्ट्रांचा प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार काश्मीर प्रश्नाच्या न्यायपूर्वक तोडग्याचा समर्थक आहे, असा दावाही मुनीर यांनी केला.

दरम्यान, भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानवर जबर नामुष्की ओढवली होती. मात्र या संघर्षाचा उल्लेख करताना पाकिस्ताने यादरम्यान, संयम आणि परिपक्वता दाखवली असा दावा दावाही मुनीर यांनी केला. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर