शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

भारतीय संसदेत सत्य उघड झाले, पाकिस्तान उघडा पडला, पुन्हा खोटा प्रचार सुरू केला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 14:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप केला आणि जगातील कोणत्याही नेत्याने भारताला 'ऑपरेशन सिंदूर' थांबवण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट केले.

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरबाबत भारत सरकारच्या विधानानंतर, पाकिस्तानने पुन्हा एकदा धमक्या दिल्या आहेत. पाकिस्तान सरकारने भारतीय संसदेत चर्चेदरम्यान केलेले आरोप 'निराधार' असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना अप्रत्यक्षपणे इशाराही दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका नव्हती. 

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, 'पहलगाम हल्ल्याबाबत कोणताही पुरावा किंवा विश्वासार्ह तपास न करता भारताने पाकिस्तानवर हल्ला केला हे जगाला माहीत आहे. भारताला त्याचे कोणतेही धोरणात्मक यश मिळवता आले नाही. दुसरीकडे, भारतीय लढाऊ विमाने आणि लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात पाकिस्तानचे यश हे एक निर्विवाद सत्य आहे, असंही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

पाकिस्तान सरकारच्या विधानात भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या सशस्त्र दलांचे झालेले नुकसान स्वीकारावे यावर भर देण्यात आला आहे.'युद्धविरामाचा निर्णय घेण्यात तिसऱ्या पक्षाची भूमिका देखील स्वीकारली पाहिजे, असंही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार दावा केला आहे की त्यांनी व्यापाराच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील संघर्ष थांबवला आहे.

भारताने स्पष्ट केले

पंतप्रधान मोदींनी मंगळवारी काँग्रेसवर पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप केला.  जगातील कोणत्याही नेत्याने भारताला 'ऑपरेशन सिंदूर' थांबवण्यास सांगितले नाही. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आणि म्हणाले की या ऑपरेशन दरम्यान संपूर्ण जगाने त्याचे समर्थन केले, परंतु सैनिकांच्या शौर्याला मुख्य विरोधी पक्षाचा पाठिंबा मिळाला नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणल्याच्या दावा आणि विरोधी पक्षांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, 'जगातील कोणत्याही नेत्याने आम्हाला ऑपरेशन (सिंदूर) थांबवण्यास सांगितले नाही.' ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, भारतीय सैन्याने २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला २२ मिनिटांत निश्चित लक्ष्यासह आणि निश्चित केलेल्या कारवाईनुसार घेतला.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान