शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Lockdown : कोरोना नव्हे, जगभरात 'या' व्हायरसमुळे होणार 14 लाख अधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 22:18 IST

कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे, आता लॉकडाउनमुळे इतर आजारांचा आणि त्यामुळे मरणारांची संख्या वाढण्याचा धोकाही वाढला आहे.

ठळक मुद्देया रिसर्चनुसार, 2025पर्यंत टीबीमुळे 14 लाख मृत्यू अधिक होऊ शकतात टीबीवर यशस्वी उपचार उपलब्ध आहेत, तरीही यामुळे दरवर्षी लाखो लोक मरण पावतातटीबीमुळे भारत, केनिया आणि यूक्रेनसारखे देश अधिक प्रभावित होतील

लंडन : कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लॉकडाउनची तर घोषणा झाली. पण, आता लॉकडाउनमुळे इतर आजारांचा आणि त्यामुळे मरणारांची संख्या वाढण्याचा धोकाही वाढला आहे. एका रिसर्चनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे ट्यूबरक्लोसिसमुळे (टीबी) होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ होऊ शकते. या रिसर्चनुसार, 2025पर्यंत टीबीमुळे 14 लाख मृत्यू अधिक होऊ शकतात.

आणखी वाचा - Lockdown : 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मिळणार मोठी 'भेट'? सरकार लवकरच करू शकतं घोषणा 

टीबीच्या संसर्गात व्हायरसचा हल्ला संक्रमित व्यक्तीच्या फुफ्फुसावर होतो. अनेक ठिकाणी या आजारावर उपचार होतात. मात्र, असे असतानाही दरवर्षी जवळपास 1 कोटी लोक टीबीमुळे संक्रमित होतात. जागतीक आरोग्य संगघटनेच्या आकडेवारीनुसार, केवळ 2018मध्येच संपूर्ण जगात टीबीमुळे 15 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. यात जवळपास 2 लाख मुलांचा समावेश होता. 

सोशल डिस्टंसिंगच्या नियमांमुळे होणार अधिक मृत्यू -टीबीवर यशस्वी उपचार उपलब्ध आहेत. तरीही यामुळे दरवर्षी लाखो लोक मरण पावतात. तज्ज्ञांच्या मते टीबीवरील उपचारातही टेस्टिंग आणि लवकरात लवकर उपचार सुरू करणे आवश्यक असते. तज्ज्ञ सांगतात, की कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाउन सुरू आहे. यामुळे टीबीचा आजार घातक रूप धारण करून परतू शकतो. कारण हेल्थ वर्कर्स सोशल डिस्टंसिंगच्या नियमांच्या पालणामुळे संक्रमित रुग्णांची वेळेवर टेस्ट करू शकणार नाहीत. परिणामी रुग्णांना वेळेवर उपचार मिळाणार नाही. अशा परिस्थितीत टीबी घातक सिद्ध होऊ शकतो आणि यामुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

आणखी वाचा - 'अशी' आहे रियाज नायकूच्या खात्म्याची 'इनसाइट स्टोरी'; भुयारातून करायचा ये-जा, जवानांनी तेथेच खोदली कबर

सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत -कोरोना व्हायरसमुळे आता नव्याच प्रकारची समस्या समोर येत आहे. यामुळे इतर संक्रमित आजारांचा धोकाही वाढला आहे. लंडनच्या इंपिरियल कॉलेजच्या आकडेवारीनुसार, टीबीमुळे भारत, केनिया आणि यूक्रेनसारखे देश अधिक प्रभावित होतील.

संबंधित आकडेवारीनुसार, दोन महिन्यांच्या अतिरिक्त लॉकडाउनमुळे संपूर्ण जगात 5 वर्षांत टीबीचा संसर्ग झालेले 18 लाख अधिक रुग्ण समोर येऊ शकतात. यामुळे जवळ-जवळ 3 लाख 40 हजार जणांचा मृत्यू होऊ शकतो.

आणखी वाचा - CoronaVirus, LockdownNews: लॉकडाउनचं उल्लंघन करणाऱ्यांना उघडं करून मारतोय 'ड्रग लॉर्ड' अल चापोचा मुलगा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLondonलंडनEnglandइंग्लंडIndiaभारत