मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे. सीमेवर गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानने काबूललाही लक्ष्य केले आहे. तालिबानने जोरदार प्रत्युत्तर दिले, यामध्ये ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच तालिबानने पाकिस्तानला इशाराही दिला आहे. जर पाकिस्तानने अशा प्रकारे युद्ध सुरू ठेवले तर त्यांना जोरदार प्रत्युत्तर मिळेल', असे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी म्हणाले. पाकिस्तानकडून होणारे हल्ले सहन करणार नाहीत असे अफगाणिस्तानने ठणकावून सांगितले आहे.
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
दरम्यान, पाकिस्तानचे माध्यमे त्यांच्या सरकार आणि लष्कराला अफगाणिस्तानशी तात्काळ तोडगा काढण्याचा सल्ला देत आहेत. पाकिस्तानचे सर्वात मोठे वृत्तपत्र 'डॉन'ने आपल्या संपादकीयात लिहिले आहे की, 'इस्लामिक देश अफगाणिस्तानसोबतचे युद्ध ताबडतोब थांबवावे. जर युद्ध सुरू राहिले तर त्याचा थेट फायदा भारताला होईल असे वृत्तपत्राने लिहिले आहे. तालिबान आणि भारत यांच्यातील संबंध चांगले नव्हते, परंतु गेल्या काही दिवसांत संबंध वेगाने सुधारले आहेत असे वृत्तपत्राने लिहिले आहे. परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी भारताच्या दौऱ्यावर गेले आहेत. वृत्तपत्राच्या मते, अफगाणिस्तानसोबतचा संघर्ष जास्त काळ चालू ठेवणे पाकिस्तानच्या हिताचे ठरणार नाही.
कतार आणि सौदी अरेबियाच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशांमधील लढाई सध्या थांबली आहे, असे पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिले आहे. "आमचे मित्र कतार आणि सौदी अरेबिया यांनी हस्तक्षेप केला आहे आणि लढाई थांबवण्याचे आवाहन केले आहे." इराणनेही असेच आवाहन केले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर द्यावे, परंतु असे पारंपारिक युद्ध लढू नये जे पुढे जाईल आणि जगाला चुकीचा संदेश देईल, असेही या वृत्तपत्रात म्हटले आहे.
अफगाणिस्तानात दहशतवाद्यांना आश्रय मिळाला
'अफगाणिस्तान तहरीक-ए-तालिबान व्यतिरिक्त अल-कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे, असा आरोप केला जात आहे. पाकिस्तान स्वतः जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांना निधी आणि आश्रय देत आहे, या दोन्ही संघटना भारतात हल्ले करत आहेत, असा आरोप केला आहे.
Web Summary : Pakistan media urges resolving the Afghan conflict, fearing India's gain from continued fighting. Taliban's ties with India are improving. Pakistan accuses Afghanistan of harboring terrorists, while facing similar accusations regarding groups targeting India. Qatar and Saudi Arabia are mediating.
Web Summary : पाकिस्तानी मीडिया ने अफगान संघर्ष को हल करने का आग्रह किया, उन्हें डर है कि जारी लड़ाई से भारत को फायदा होगा। तालिबान के भारत के साथ संबंध बेहतर हो रहे हैं। पाकिस्तान ने अफगानिस्तान पर आतंकवादियों को शरण देने का आरोप लगाया, जबकि भारत को निशाना बनाने वाले समूहों के बारे में उस पर भी इसी तरह के आरोप हैं। कतर और सऊदी अरब मध्यस्थता कर रहे हैं।