शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

आशियातील ‘ते’ तीन माजी पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 09:21 IST

भारत, पाकिस्तान, जपान हे आशिया खंडातील तीन देश आहेत. आणखी एक दुर्देवी साम्य असे की...

समीर परांजपे, मुख्य उपसंपादक

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे संसदीय निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण करत असताना ८ जुलै रोजी एका हल्लेखोराने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. जगासाठी ही अतिशय धक्कादायक घटना होती. शिंजो आबे हे जपानचे विविध कालखंडात चार वेळा पंतप्रधान झाले होते. भारताविषयी त्यांना जिव्हाळा होता. त्यामुळेच मनमोहन सिंग व आता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत आबे यांचे त्यांच्याशी छान मैत्र जुळले. आबे यांची हत्या करणारा तेत्सुया यामागामी याला शिंजो आबे यांचे राजकीय विचार पटत नव्हते. त्यांची हत्या झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आघाडीच्या बाजूने जपानमध्ये सहानुभूतीची लाट आली आणि त्या आघाडीला मोठा विजय मिळाला. माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा आता आरोप होत आहे. आबे यांच्या हत्येच्या चौकशीत अमेरिकी तपास यंत्रणाही मदत करणार आहेत. त्यांच्या निधनामुळे भारताने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळला होता. भारताने एक सच्चा मित्र गमावला आहे.

राजीव गांधी यांचा दुर्दैवी अंत 

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी हत्या झाली. १९९१च्या लोकसभा निवडणुकांत तामिळनाडूतील श्रीपेरुम्बुदुर मतदारसंघामध्ये राजीव गांधी निवडणूक प्रचार करत होते. त्यावेळी एलटीटीईची महिला दहशतवादी तेनमोळी राजरत्नम हिने राजीव गांधी यांच्या पाया पडण्याचा आविर्भाव केला व शरीरावर गुंडाळलेल्या पट्ट्यात दडवलेल्या आरडीएक्सचा स्फोट केला. त्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधी, हल्लेखोर व अन्य काही जण ठार झाले. १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर अगदी आकस्मिकपणे राजीव गांधी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आली. श्रीलंकेत भारताने शांतीसेना पाठवल्याने एलटीटीईचा राजीव गांधी यांच्यावर रोष होता. या हत्या प्रकरणी इतर आरोपींना कालांतराने पकडण्यात आले. भारताच्या इतिहासात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.

महिला पंतप्रधानाची अखेर

पाकिस्तानचे दोनदा पंतप्रधानपद भूषविलेल्या बेनझीर भुत्तो यांची रावळपिंडी येथे एका निवडणूक प्रचारयात्रेत २७ डिसेंबर २००७ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या प्रमुख व तत्कालीन विरोधी पक्षनेत्या बेनझीर यांनी पाकिस्तानमध्ये जानेवारी २००८मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ही प्रचारयात्रा काढली होती. रावळपिंडी येथील लियाकत उद्यानामध्ये बेनझीर भुत्तो यांच्यावर गोळीबार तसेच आत्मघाती बॉम्बस्फोटही घडविण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या बेनझीर यांना तातडीने एका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बेनझीर भुत्तो यांचे वडील व पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना पाकिस्तानमध्ये फाशी देण्यात आले होते. बेनझीर भुत्तो यांच्या हत्येनंतर ते आजवर पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय उलथापालथी झाल्या पण तिथे आणखी एखाद्या महिलेला पंतप्रधानपद मिळाले असे घडले नाही. त्यामुळे बेनझीर भुत्तो म्हणजे पाकिस्तानच्या एकमेव महिला पंतप्रधान अशीच नोंद इतिहासामध्ये कायम आहे.

टॅग्स :JapanजपानRajiv Gandhiराजीव गांधीIndiaभारत