शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

आशियातील ‘ते’ तीन माजी पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 09:21 IST

भारत, पाकिस्तान, जपान हे आशिया खंडातील तीन देश आहेत. आणखी एक दुर्देवी साम्य असे की...

समीर परांजपे, मुख्य उपसंपादक

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे संसदीय निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण करत असताना ८ जुलै रोजी एका हल्लेखोराने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. जगासाठी ही अतिशय धक्कादायक घटना होती. शिंजो आबे हे जपानचे विविध कालखंडात चार वेळा पंतप्रधान झाले होते. भारताविषयी त्यांना जिव्हाळा होता. त्यामुळेच मनमोहन सिंग व आता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत आबे यांचे त्यांच्याशी छान मैत्र जुळले. आबे यांची हत्या करणारा तेत्सुया यामागामी याला शिंजो आबे यांचे राजकीय विचार पटत नव्हते. त्यांची हत्या झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आघाडीच्या बाजूने जपानमध्ये सहानुभूतीची लाट आली आणि त्या आघाडीला मोठा विजय मिळाला. माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा आता आरोप होत आहे. आबे यांच्या हत्येच्या चौकशीत अमेरिकी तपास यंत्रणाही मदत करणार आहेत. त्यांच्या निधनामुळे भारताने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळला होता. भारताने एक सच्चा मित्र गमावला आहे.

राजीव गांधी यांचा दुर्दैवी अंत 

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी हत्या झाली. १९९१च्या लोकसभा निवडणुकांत तामिळनाडूतील श्रीपेरुम्बुदुर मतदारसंघामध्ये राजीव गांधी निवडणूक प्रचार करत होते. त्यावेळी एलटीटीईची महिला दहशतवादी तेनमोळी राजरत्नम हिने राजीव गांधी यांच्या पाया पडण्याचा आविर्भाव केला व शरीरावर गुंडाळलेल्या पट्ट्यात दडवलेल्या आरडीएक्सचा स्फोट केला. त्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधी, हल्लेखोर व अन्य काही जण ठार झाले. १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर अगदी आकस्मिकपणे राजीव गांधी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आली. श्रीलंकेत भारताने शांतीसेना पाठवल्याने एलटीटीईचा राजीव गांधी यांच्यावर रोष होता. या हत्या प्रकरणी इतर आरोपींना कालांतराने पकडण्यात आले. भारताच्या इतिहासात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.

महिला पंतप्रधानाची अखेर

पाकिस्तानचे दोनदा पंतप्रधानपद भूषविलेल्या बेनझीर भुत्तो यांची रावळपिंडी येथे एका निवडणूक प्रचारयात्रेत २७ डिसेंबर २००७ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या प्रमुख व तत्कालीन विरोधी पक्षनेत्या बेनझीर यांनी पाकिस्तानमध्ये जानेवारी २००८मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ही प्रचारयात्रा काढली होती. रावळपिंडी येथील लियाकत उद्यानामध्ये बेनझीर भुत्तो यांच्यावर गोळीबार तसेच आत्मघाती बॉम्बस्फोटही घडविण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या बेनझीर यांना तातडीने एका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बेनझीर भुत्तो यांचे वडील व पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना पाकिस्तानमध्ये फाशी देण्यात आले होते. बेनझीर भुत्तो यांच्या हत्येनंतर ते आजवर पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय उलथापालथी झाल्या पण तिथे आणखी एखाद्या महिलेला पंतप्रधानपद मिळाले असे घडले नाही. त्यामुळे बेनझीर भुत्तो म्हणजे पाकिस्तानच्या एकमेव महिला पंतप्रधान अशीच नोंद इतिहासामध्ये कायम आहे.

टॅग्स :JapanजपानRajiv Gandhiराजीव गांधीIndiaभारत