शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

दरवर्षी करायच्या १३ लाख कोटींची चोरी!; बांगलादेश सरकारचा शेख हसीनांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 12:01 IST

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने देशाच्या शेख हसीना यांच्याबाबत एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे

Sheikh Hasina : बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. अशातच बांगलादेशच्या अंतरिम सरकारने देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, शेख हसीना पंतप्रधान असताना दरवर्षी सुमारे १६ अब्ज डॉलर्सची चोरी झाल्याचे समोर आलं आहे. हा अहवाल सादर करणारी समिती अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी स्थापन केली होती. त्यामुळे आता शेख हसीना यांच्याविरोधात आणखीनचं वातावरण तापण्याची शक्यता आहे.

शेख हसीना यांच्या भ्रष्ट हुकूमशाही दरम्यान बांगलादेशातून दरवर्षी सरासरी १६ अब्ज डॉलर्स बेकायदेशीरपणे बाहेर काढले जात होते असा धक्कादायक धावा बांगलादेशच्या अंतरिम सरकारने केला आहे. या अहवालानुसार, शेख हसीना यांच्या १५ वर्षांच्या राजवटीत देशात दरवर्षी सरासरी १६ अब्ज डॉलर्सची चोरी झाली आहे.

"त्यांनी अर्थव्यवस्थेची कशी लूट केली हे कळल्यानंतर आमचे रक्त उकळत आहे. दुःखाची गोष्ट ही आहे की त्यांनी उघडपणे लूट केली आणि आपल्यापैकी बहुतेकांना त्याचा सामना करण्याचे धाडसही झाले नाही. अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती काय आहे हे या दस्तऐवजावरून दिसून येते," अशी प्रतिक्रिया मोहम्मद युनूस यांनी दिली आहे. तसेच ही समस्या आपल्या समजण्यापेक्षा खोल असल्याचेही समितीने म्हटलं आहे. 

समितीने हसीना यांच्या राजवटीत भ्रष्टाचार आणि गंभीर गैरव्यवहाराचे पुरावे सादर केले आहेत. या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना जबाबदार धरण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू करण्याची शिफारससुद्धा या समितीने केली आहे.जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्यांच्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पद आणि देश सोडला होता. यानंतर शेख हसीना यांच्या पक्षाच्या काही नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं तर काही बांगलादेशात लपून बसले आहेत. अनेक नेते देश सोडून गेले आहेत. दुसरीकडे, हसीना यांच्या पक्षाच्या कोणत्याही प्रवक्त्याने या आरोपांवर भाष्य केलेले नाही.

युनूस यांच्या नेतृत्वाखालील समितीने शेख हसीना यांच्या राजवटीत लागू केलेल्या २९ पैकी सात प्रमुख योजनांची चौकशी केली. या योजनांमध्ये १०० अब्जांपेक्षा जास्त बांगलादेशी पैसे खर्च करण्यात आले होते. तपासणी केलेल्या सात प्रकल्पांची सुरुवातीची किंमत १.१४ ट्रिलियन टक्का होती. हसीना यांच्या सरकारने नंतर ती वाढवून १.९५ ट्रिलियन रुपये केली. 

दरम्यान, समितीचे सदस्य डॉ.ए.के. एनामुल हक यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षात विकास योजनांवर ७,००,००० कोटी रुपयांहून अधिक खर्च केले गेले आहेत. त्यामध्ये ४० टक्के नोकरशहांनी गंडा घातला आहे. हा अहवाल लवकरच सार्वजनिक केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :BangladeshबांगलादेशfraudधोकेबाजीCorruptionभ्रष्टाचार