शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दरवर्षी करायच्या १३ लाख कोटींची चोरी!; बांगलादेश सरकारचा शेख हसीनांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 12:01 IST

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने देशाच्या शेख हसीना यांच्याबाबत एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे

Sheikh Hasina : बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. अशातच बांगलादेशच्या अंतरिम सरकारने देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, शेख हसीना पंतप्रधान असताना दरवर्षी सुमारे १६ अब्ज डॉलर्सची चोरी झाल्याचे समोर आलं आहे. हा अहवाल सादर करणारी समिती अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी स्थापन केली होती. त्यामुळे आता शेख हसीना यांच्याविरोधात आणखीनचं वातावरण तापण्याची शक्यता आहे.

शेख हसीना यांच्या भ्रष्ट हुकूमशाही दरम्यान बांगलादेशातून दरवर्षी सरासरी १६ अब्ज डॉलर्स बेकायदेशीरपणे बाहेर काढले जात होते असा धक्कादायक धावा बांगलादेशच्या अंतरिम सरकारने केला आहे. या अहवालानुसार, शेख हसीना यांच्या १५ वर्षांच्या राजवटीत देशात दरवर्षी सरासरी १६ अब्ज डॉलर्सची चोरी झाली आहे.

"त्यांनी अर्थव्यवस्थेची कशी लूट केली हे कळल्यानंतर आमचे रक्त उकळत आहे. दुःखाची गोष्ट ही आहे की त्यांनी उघडपणे लूट केली आणि आपल्यापैकी बहुतेकांना त्याचा सामना करण्याचे धाडसही झाले नाही. अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती काय आहे हे या दस्तऐवजावरून दिसून येते," अशी प्रतिक्रिया मोहम्मद युनूस यांनी दिली आहे. तसेच ही समस्या आपल्या समजण्यापेक्षा खोल असल्याचेही समितीने म्हटलं आहे. 

समितीने हसीना यांच्या राजवटीत भ्रष्टाचार आणि गंभीर गैरव्यवहाराचे पुरावे सादर केले आहेत. या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना जबाबदार धरण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू करण्याची शिफारससुद्धा या समितीने केली आहे.जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्यांच्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पद आणि देश सोडला होता. यानंतर शेख हसीना यांच्या पक्षाच्या काही नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं तर काही बांगलादेशात लपून बसले आहेत. अनेक नेते देश सोडून गेले आहेत. दुसरीकडे, हसीना यांच्या पक्षाच्या कोणत्याही प्रवक्त्याने या आरोपांवर भाष्य केलेले नाही.

युनूस यांच्या नेतृत्वाखालील समितीने शेख हसीना यांच्या राजवटीत लागू केलेल्या २९ पैकी सात प्रमुख योजनांची चौकशी केली. या योजनांमध्ये १०० अब्जांपेक्षा जास्त बांगलादेशी पैसे खर्च करण्यात आले होते. तपासणी केलेल्या सात प्रकल्पांची सुरुवातीची किंमत १.१४ ट्रिलियन टक्का होती. हसीना यांच्या सरकारने नंतर ती वाढवून १.९५ ट्रिलियन रुपये केली. 

दरम्यान, समितीचे सदस्य डॉ.ए.के. एनामुल हक यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षात विकास योजनांवर ७,००,००० कोटी रुपयांहून अधिक खर्च केले गेले आहेत. त्यामध्ये ४० टक्के नोकरशहांनी गंडा घातला आहे. हा अहवाल लवकरच सार्वजनिक केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :BangladeshबांगलादेशfraudधोकेबाजीCorruptionभ्रष्टाचार