शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न, भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 21:25 IST

काश्मीर प्रश्नावरून यूएनएचआरसीसमोर रडगाणे गाणाऱ्या पाकिस्तानचा खोटारडेपणा भारताने उघडा पाडला आहे.

 

जिनिव्हा -  काश्मीर प्रश्नावरून यूएनएचआरसीसमोर रडगाणे गाणाऱ्या पाकिस्तानचा खोटारडेपणा भारताने उघडा पाडला आहे. तसेचा काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि कलम 370 बाबतचा निर्णय हा जनभावनेचा विचार करून घेतला आहे, असे भारताने पाकिस्तानसह जगाला ठणकावून सांगितले आहे. तसेच  दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानला खोट्या कहाण्या सांगायची सवय झाली आहे, असा टोलाही भारताने यावेळी लगावला. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर (यूएनएचआरसी) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्याला भारताकडून परराष्ट्र मंत्रालयातील सचिव विजय ठाकूर सिंह यांनी प्रत्युत्तर दिले. काश्मीरमधील परिस्थिती हळुहळू सामान्य होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विजय सिंह ठाकूर म्हणाल्या की, ''आमची राज्य घटना कुठलाही भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान हक्क देते. आमची स्वतंत्र न्यायपालिका, मुक्त प्रसारमाध्यमे आणि आमचा समाज मानवाधिकारांचे रक्षण करतो. कलम 370 बाबत आम्ही हल्लीच घेतलेल्या निर्णयामुळे जम्मू काश्मीरमधील रहिवाशांना प्रत्येक नागरिकाप्रमाणे समान हक्क मिळतील. या निर्णयामुळे लिंगभेद कमी होईल तसेच लहान मुलांनाही योग्य ते अधिकार मिळतील.''

काश्मीरवरून खोटारडेपणा करणाऱ्या पाकिस्तानलाही विजय सिंह ठाकूर यांनी यावेळी खडेबोल सुनावले. ''काश्मीरबाबतच्या खोट्या कहाण्या जागतिक दहशतवादाचे केंद्र बनलेल्या ठिकाणाहून येतात, हे जगाला माहिती आहे. या ठिकाणी दहशतवादाला आश्रय दिला जातो. तसेच संसदेकडून पारित करण्यात येणाऱ्या अन्य कायद्यांप्रमाणे काश्मीरबाबत घेण्यात आलेला निर्णयसुद्धा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, याचा  आम्ही पुनरुच्चार करू इच्छितो.''असेही त्यांनी ठणकावले.  

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक निर्णयामुळे पाकिस्तानची पुरती कोंडी झाली आहे. दरम्यान, आज पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.  पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर (यूएनएचआरसी) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप केला. यूएनएचआरसीने काश्मीरमधील मानवाधिकारांच्या हननाकडे लक्ष द्यावे, असे सांगत त्यांनी  याप्रकरणी संयुक्त तपास समिती स्थापन करण्याची मागणी केली. यूएनएचआरसीने काश्मीरच्या मुद्द्यावरून मौन बाळगू  नये. भारताने काश्मिरींना दिलेला विशेष दर्जा संपुष्टात आणला आहे. काश्मीर हे मानवाधिकारांची दफनभूमी बनली आहे, असा आरोपही पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी केला.   

टॅग्स :IndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान