शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न, भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 21:25 IST

काश्मीर प्रश्नावरून यूएनएचआरसीसमोर रडगाणे गाणाऱ्या पाकिस्तानचा खोटारडेपणा भारताने उघडा पाडला आहे.

 

जिनिव्हा -  काश्मीर प्रश्नावरून यूएनएचआरसीसमोर रडगाणे गाणाऱ्या पाकिस्तानचा खोटारडेपणा भारताने उघडा पाडला आहे. तसेचा काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि कलम 370 बाबतचा निर्णय हा जनभावनेचा विचार करून घेतला आहे, असे भारताने पाकिस्तानसह जगाला ठणकावून सांगितले आहे. तसेच  दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानला खोट्या कहाण्या सांगायची सवय झाली आहे, असा टोलाही भारताने यावेळी लगावला. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर (यूएनएचआरसी) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्याला भारताकडून परराष्ट्र मंत्रालयातील सचिव विजय ठाकूर सिंह यांनी प्रत्युत्तर दिले. काश्मीरमधील परिस्थिती हळुहळू सामान्य होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विजय सिंह ठाकूर म्हणाल्या की, ''आमची राज्य घटना कुठलाही भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान हक्क देते. आमची स्वतंत्र न्यायपालिका, मुक्त प्रसारमाध्यमे आणि आमचा समाज मानवाधिकारांचे रक्षण करतो. कलम 370 बाबत आम्ही हल्लीच घेतलेल्या निर्णयामुळे जम्मू काश्मीरमधील रहिवाशांना प्रत्येक नागरिकाप्रमाणे समान हक्क मिळतील. या निर्णयामुळे लिंगभेद कमी होईल तसेच लहान मुलांनाही योग्य ते अधिकार मिळतील.''

काश्मीरवरून खोटारडेपणा करणाऱ्या पाकिस्तानलाही विजय सिंह ठाकूर यांनी यावेळी खडेबोल सुनावले. ''काश्मीरबाबतच्या खोट्या कहाण्या जागतिक दहशतवादाचे केंद्र बनलेल्या ठिकाणाहून येतात, हे जगाला माहिती आहे. या ठिकाणी दहशतवादाला आश्रय दिला जातो. तसेच संसदेकडून पारित करण्यात येणाऱ्या अन्य कायद्यांप्रमाणे काश्मीरबाबत घेण्यात आलेला निर्णयसुद्धा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, याचा  आम्ही पुनरुच्चार करू इच्छितो.''असेही त्यांनी ठणकावले.  

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक निर्णयामुळे पाकिस्तानची पुरती कोंडी झाली आहे. दरम्यान, आज पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.  पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर (यूएनएचआरसी) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप केला. यूएनएचआरसीने काश्मीरमधील मानवाधिकारांच्या हननाकडे लक्ष द्यावे, असे सांगत त्यांनी  याप्रकरणी संयुक्त तपास समिती स्थापन करण्याची मागणी केली. यूएनएचआरसीने काश्मीरच्या मुद्द्यावरून मौन बाळगू  नये. भारताने काश्मिरींना दिलेला विशेष दर्जा संपुष्टात आणला आहे. काश्मीर हे मानवाधिकारांची दफनभूमी बनली आहे, असा आरोपही पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी केला.   

टॅग्स :IndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान