शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
4
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
5
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
6
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
7
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
8
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?
9
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
10
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
11
भावा जिंकलस! 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये पोहोचला प्रणित मोरे, 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले
12
"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video
13
New Rules 1 December 2025: आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
14
Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकर की कोहली? वनडेतील सर्वोत्तम फलंदाज कोण? गावस्कर म्हणाले...
15
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
16
'गुरुजन' इतके क्रूर होऊच कसे शकतात? आपण फार मोठी जोखीम स्वीकारतो आहोत
17
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
18
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
19
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
20
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न, भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 21:25 IST

काश्मीर प्रश्नावरून यूएनएचआरसीसमोर रडगाणे गाणाऱ्या पाकिस्तानचा खोटारडेपणा भारताने उघडा पाडला आहे.

 

जिनिव्हा -  काश्मीर प्रश्नावरून यूएनएचआरसीसमोर रडगाणे गाणाऱ्या पाकिस्तानचा खोटारडेपणा भारताने उघडा पाडला आहे. तसेचा काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि कलम 370 बाबतचा निर्णय हा जनभावनेचा विचार करून घेतला आहे, असे भारताने पाकिस्तानसह जगाला ठणकावून सांगितले आहे. तसेच  दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानला खोट्या कहाण्या सांगायची सवय झाली आहे, असा टोलाही भारताने यावेळी लगावला. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर (यूएनएचआरसी) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्याला भारताकडून परराष्ट्र मंत्रालयातील सचिव विजय ठाकूर सिंह यांनी प्रत्युत्तर दिले. काश्मीरमधील परिस्थिती हळुहळू सामान्य होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विजय सिंह ठाकूर म्हणाल्या की, ''आमची राज्य घटना कुठलाही भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान हक्क देते. आमची स्वतंत्र न्यायपालिका, मुक्त प्रसारमाध्यमे आणि आमचा समाज मानवाधिकारांचे रक्षण करतो. कलम 370 बाबत आम्ही हल्लीच घेतलेल्या निर्णयामुळे जम्मू काश्मीरमधील रहिवाशांना प्रत्येक नागरिकाप्रमाणे समान हक्क मिळतील. या निर्णयामुळे लिंगभेद कमी होईल तसेच लहान मुलांनाही योग्य ते अधिकार मिळतील.''

काश्मीरवरून खोटारडेपणा करणाऱ्या पाकिस्तानलाही विजय सिंह ठाकूर यांनी यावेळी खडेबोल सुनावले. ''काश्मीरबाबतच्या खोट्या कहाण्या जागतिक दहशतवादाचे केंद्र बनलेल्या ठिकाणाहून येतात, हे जगाला माहिती आहे. या ठिकाणी दहशतवादाला आश्रय दिला जातो. तसेच संसदेकडून पारित करण्यात येणाऱ्या अन्य कायद्यांप्रमाणे काश्मीरबाबत घेण्यात आलेला निर्णयसुद्धा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, याचा  आम्ही पुनरुच्चार करू इच्छितो.''असेही त्यांनी ठणकावले.  

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक निर्णयामुळे पाकिस्तानची पुरती कोंडी झाली आहे. दरम्यान, आज पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.  पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर (यूएनएचआरसी) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप केला. यूएनएचआरसीने काश्मीरमधील मानवाधिकारांच्या हननाकडे लक्ष द्यावे, असे सांगत त्यांनी  याप्रकरणी संयुक्त तपास समिती स्थापन करण्याची मागणी केली. यूएनएचआरसीने काश्मीरच्या मुद्द्यावरून मौन बाळगू  नये. भारताने काश्मिरींना दिलेला विशेष दर्जा संपुष्टात आणला आहे. काश्मीर हे मानवाधिकारांची दफनभूमी बनली आहे, असा आरोपही पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी केला.   

टॅग्स :IndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान