शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघण्याचे संकेत, संघर्ष मिटविण्यासाठी भारत, चीन ब्राझीलशी सातत्याने संपर्कात : व्लादिमिर पुतिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 07:00 IST

Russia Ukrain War: युक्रेनशी सुरू असलेला संघर्ष मिटवण्यासाठी आपण भारत, चीन आणि ब्राझील या देशांशी सातत्याने संपर्कात असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी हे तिन्ही देश प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

माॅस्काे - युक्रेनशी सुरू असलेला संघर्ष मिटवण्यासाठी आपण भारत, चीन आणि ब्राझील या देशांशी सातत्याने संपर्कात असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी हे तिन्ही देश प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘तास’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.इस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या अधिवेशनात पुतिन यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे फेब्रुवारी २०२२ पासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघण्याचे संकेत मानले जात आहेत. या मुद्द्यावर वाटाघाटींची युक्रेनची तयारी असेल तर मी पण त्या दिशेने पाऊल टाकू शकेन, असे पुतिन यांनी म्हटल्याचे अमेरिकी वृत्तसंस्था ‘पॉलिटिको’ने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २३ ऑगस्ट रोजी केलेल्या युक्रेन दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर दोन आठवड्यांच्या आतच पुतिन यांनी भारताचे नाव घेऊन वाटाघाटीबाबत हे वक्तव्य केले आहे. ‘मित्र आणि सहकाऱ्यांचा आम्ही आदर करतो. या वादासंबंधी सर्व मुद्द्यांवर तोडगा निघावा म्हणून प्रामुख्याने चीन, ब्राझील आणि भारत यांच्या असलेल्या प्रामाणिक इच्छेबाबत मला विश्वास आहे’, असे पुतिन यांनी म्हटल्याचे ‘तास’ वृत्तसंस्थेने नमूद केले आहे.

रशिया म्हणताे, भारतच खुला करू शकताे चर्चेचा मार्ग- रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना युक्रेनशी चर्चेचा मार्ग खुला करण्यात भारत मदत करू शकतो, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात असलेले विश्वासाचे आणि मैत्रीचे संबंध पाहता या वादावर तोडग्यासाठी तेच पहिले पाऊल उचलू शकतील, असेही त्यांनी नमूद केले.

-पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करताना, हे युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र चर्चा करावी आणि या भागात पूर्ण शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी भारत महत्त्वाची भूमिका पार पाडण्यास तयार असल्याचे म्हटले होते.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिनIndiaभारतchinaचीनBrazilब्राझील