शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

आता भूतानही भारताशी रेल्वेने जोडले जाणार, पाच मार्गांचा अहवाल सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 11:57 IST

अॅक्ट इस्ट पॉलिसीनुसार केंद्र सरकार ईशान्य भारतातील राज्यांमार्फत पूर्व आणि दक्षिण आशियाई देशांशी संपर्क वाढवत आहे.

नवी दिल्ली- दक्षिण आशियाई देशांशी ईशान्य भारताच्या मार्गाने संबंध वृद्धींगत करण्यासाठी केंद्र सरकारने अॅक्ट इस्ट धोरण अवलंबले आहे. या ईशान्य भारतीय राज्यांमधून नेपाळ, बांगलादेश, म्यानमारला जाण्यास रेल्वेमार्ग बांधण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्यामध्ये भूतानला भारताशी रेल्वेने जोडण्यास संभाव्य पाच मार्गांचा अहवाल ईशान्य सीमावर्ती रेल्वेमार्ग विभागाने परराष्ट्र मंत्रालयाला सादर केला आहे. असा अभ्यास करुन प्रस्ताव देण्याची विनंती परराष्ट्र मंत्रालयानेच ईशान्य सीमावर्ती विभागाला केली होती.

या अहवालात पाच संभाव्य मार्गांचा विचार केला असून ते सर्व पश्चिम बंगाल राज्यातून जात आहेत. पहिल्या ५७ किमी लांबीच्या मार्गाची सुरुवात पश्चिम बंगालमधील कोक्राझार येथे होईल आणि तो मार्ग भूतानमधील गेलेफू या गावाला जोडेल. दुसरा मार्ग ५१.१५ किमीचा असून तो मार्ग पश्चिम बंगालमधील पाथसाला येथे सुरु होईल आणि भूताननधील नागलाम येथे संपेल. तिसरा मार्ग पश्चिम बंगालमधील  रांगिया आणि भूतानमधील समद्रुजोंक्जार यांना जोडेल, हा मार्ग ४८ किमीचा असेल. चौथा रेल्वेमार्ग २३ किमीचा असून तो पश्चिम बंगालमधील बनारहाट पासून सुरु होऊन भूतानमधील सामस्ते येथे संपेल. पाचवा मार्ग केवळ १७ किमीचा असून तो पश्चिम बंगालमधील  हासिमारा आणि भूतानमधील फ्युनत्शोंगलिंग यांना जोडेल. हे मार्ग तांत्रिकदृष्ट्या पश्चिम बंगालमध्ये असले तरी त्याचा खरा फायदा ईशान्य भारताच्या विकासासाठी आणि भारत- भूतान संबंध अधिक दृढ होण्यासाठी होतील.

सध्या भारत आणि भूतान यांच्यामध्ये रेल्वेमार्ग नाही. अहवालात दिलेल्या पाच मार्गांचा विचार करुन एका मार्गाचे बांधकाम होईल आणि भूतान भारताशी रेल्वेनेही जोडले जाईल. केंद्र सरकारने ईशान्य भारतावर विशेष लक्ष केंद्रित करुन अॅक्ट इस्ट योजनेवर भर दिला आहे. काही दिवसांपुर्वीच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती. इतकी वर्षे सिक्किम राज्य रेल्वेमार्ग आणि विमानतळापासून वंचित राहिले होते. ते राज्यही रेल्वेने लवकरच जोडले जात असून पाक्योंग येथे विमानतळ बांधून तयार झाला आहे. १९७५ साली सिक्किम भारताचे २२ वे राज्य म्हणून भारतात सामिल झाले. आता ४३ वर्षांनंतर तेथे रेल्वेमार्ग आणि विमानतळ तयार होत आहेत. गेल्यावर्षी डोकलाम येथेे तयार झालेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर भारताने भूतानला रेल्वेमार्गाने जवळ आणणेे आणि सिक्किममध्ये वाहतूक मार्ग सुधारणे, विमानतळ बांधणे ही आश्वासक वाटचाल म्हणावी लागेल. तसेच भारतातील सर्वात लांब रेल्वे आणि रस्ते पूल आसाम व अरुणाचल प्रदेश यांच्या दरम्यान ब्रह्मपुत्रा नदीवर बांधला आहे, त्याचे लवकरच उद्घाटन होईल..या पुलाचाही फायदा चीन सीमेवरील भारतीय सैनिकांना होईल. 

टॅग्स :BhutanभूतानIndiaभारतnorth eastईशान्य भारतsikkimसिक्किमwest bengalपश्चिम बंगालrailwayरेल्वेAct east policyअॅक्ट इस्ट पॉलिसी