शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

आता भूतानही भारताशी रेल्वेने जोडले जाणार, पाच मार्गांचा अहवाल सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 11:57 IST

अॅक्ट इस्ट पॉलिसीनुसार केंद्र सरकार ईशान्य भारतातील राज्यांमार्फत पूर्व आणि दक्षिण आशियाई देशांशी संपर्क वाढवत आहे.

नवी दिल्ली- दक्षिण आशियाई देशांशी ईशान्य भारताच्या मार्गाने संबंध वृद्धींगत करण्यासाठी केंद्र सरकारने अॅक्ट इस्ट धोरण अवलंबले आहे. या ईशान्य भारतीय राज्यांमधून नेपाळ, बांगलादेश, म्यानमारला जाण्यास रेल्वेमार्ग बांधण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्यामध्ये भूतानला भारताशी रेल्वेने जोडण्यास संभाव्य पाच मार्गांचा अहवाल ईशान्य सीमावर्ती रेल्वेमार्ग विभागाने परराष्ट्र मंत्रालयाला सादर केला आहे. असा अभ्यास करुन प्रस्ताव देण्याची विनंती परराष्ट्र मंत्रालयानेच ईशान्य सीमावर्ती विभागाला केली होती.

या अहवालात पाच संभाव्य मार्गांचा विचार केला असून ते सर्व पश्चिम बंगाल राज्यातून जात आहेत. पहिल्या ५७ किमी लांबीच्या मार्गाची सुरुवात पश्चिम बंगालमधील कोक्राझार येथे होईल आणि तो मार्ग भूतानमधील गेलेफू या गावाला जोडेल. दुसरा मार्ग ५१.१५ किमीचा असून तो मार्ग पश्चिम बंगालमधील पाथसाला येथे सुरु होईल आणि भूताननधील नागलाम येथे संपेल. तिसरा मार्ग पश्चिम बंगालमधील  रांगिया आणि भूतानमधील समद्रुजोंक्जार यांना जोडेल, हा मार्ग ४८ किमीचा असेल. चौथा रेल्वेमार्ग २३ किमीचा असून तो पश्चिम बंगालमधील बनारहाट पासून सुरु होऊन भूतानमधील सामस्ते येथे संपेल. पाचवा मार्ग केवळ १७ किमीचा असून तो पश्चिम बंगालमधील  हासिमारा आणि भूतानमधील फ्युनत्शोंगलिंग यांना जोडेल. हे मार्ग तांत्रिकदृष्ट्या पश्चिम बंगालमध्ये असले तरी त्याचा खरा फायदा ईशान्य भारताच्या विकासासाठी आणि भारत- भूतान संबंध अधिक दृढ होण्यासाठी होतील.

सध्या भारत आणि भूतान यांच्यामध्ये रेल्वेमार्ग नाही. अहवालात दिलेल्या पाच मार्गांचा विचार करुन एका मार्गाचे बांधकाम होईल आणि भूतान भारताशी रेल्वेनेही जोडले जाईल. केंद्र सरकारने ईशान्य भारतावर विशेष लक्ष केंद्रित करुन अॅक्ट इस्ट योजनेवर भर दिला आहे. काही दिवसांपुर्वीच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती. इतकी वर्षे सिक्किम राज्य रेल्वेमार्ग आणि विमानतळापासून वंचित राहिले होते. ते राज्यही रेल्वेने लवकरच जोडले जात असून पाक्योंग येथे विमानतळ बांधून तयार झाला आहे. १९७५ साली सिक्किम भारताचे २२ वे राज्य म्हणून भारतात सामिल झाले. आता ४३ वर्षांनंतर तेथे रेल्वेमार्ग आणि विमानतळ तयार होत आहेत. गेल्यावर्षी डोकलाम येथेे तयार झालेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर भारताने भूतानला रेल्वेमार्गाने जवळ आणणेे आणि सिक्किममध्ये वाहतूक मार्ग सुधारणे, विमानतळ बांधणे ही आश्वासक वाटचाल म्हणावी लागेल. तसेच भारतातील सर्वात लांब रेल्वे आणि रस्ते पूल आसाम व अरुणाचल प्रदेश यांच्या दरम्यान ब्रह्मपुत्रा नदीवर बांधला आहे, त्याचे लवकरच उद्घाटन होईल..या पुलाचाही फायदा चीन सीमेवरील भारतीय सैनिकांना होईल. 

टॅग्स :BhutanभूतानIndiaभारतnorth eastईशान्य भारतsikkimसिक्किमwest bengalपश्चिम बंगालrailwayरेल्वेAct east policyअॅक्ट इस्ट पॉलिसी