श्रीलंका निवडणुकीत चीन समर्थक महिंदा राजपक्षेंना दोन तृतीयांश बहुमत, भारताची डोकेदुखी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 02:29 PM2020-08-07T14:29:16+5:302020-08-07T14:30:30+5:30

या जोरदार विजयामुळे पुन्हा एकदा श्रीलंकेत महिंदा राजपक्षे परतणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. 

pro china mahinda rajapaksa gets majority in sri lanka election know what will be impact on india | श्रीलंका निवडणुकीत चीन समर्थक महिंदा राजपक्षेंना दोन तृतीयांश बहुमत, भारताची डोकेदुखी वाढणार?

श्रीलंका निवडणुकीत चीन समर्थक महिंदा राजपक्षेंना दोन तृतीयांश बहुमत, भारताची डोकेदुखी वाढणार?

Next

कोलंबो - पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीनं शुक्रवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत चांगलाच विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार 225 सदस्यांच्या संसदेत एसएलपीपीने एकट्याने 145 जागा जिंकल्या आणि मित्र पक्षांनी मिळून एकूण 150 जागा जिंकल्या. अशा प्रकारे पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. पक्षाला 68 लाख म्हणजेच 59.9 टक्के मते मिळाली. या जोरदार विजयामुळे पुन्हा एकदा श्रीलंकेत महिंदा राजपक्षे परतणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. 

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या जबरदस्त विजयाबद्दल त्यांना अभिनंदन करणारे पहिले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. ते म्हणाले की, दोन्ही बाजू सर्व क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांना पुढे नेण्याचे कार्य करतील आणि विशेष संबंध नवीन उंचावर नेले जातील. ही माहिती देताना राजपक्षे यांनी ट्विट केले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर माझे अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद." श्रीलंकेच्या जनतेच्या पाठिंब्याने दोन्ही देशांमधील दीर्घकाळ कामकाज सुरू ठेवण्यासाठी तुमच्याबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे. श्रीलंका आणि भारत चांगले मित्र आणि सहयोगी आहेत. ”महिंदा राजपक्षे यांना चीन समर्थक म्हणून ओळखले जात असल्यानं ते भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात. 

'महिंदा राजपक्षे यांना भारत आणि चीन या दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास आवडेल'
आंतरराष्ट्रीय कामकाज तज्ज्ञ कमर आगा यांनी सांगितले की, श्रीलंका स्वत: च्या फायद्यासाठी भारत आणि चीनकडून फायदा घेत आहे. श्रीलंका आपले काही प्रकल्प चीन आणि काही भारताला हलवण्याच्या विचारात आहे. महिंदा राजपक्षे यांना दोन्ही देशांशी संबंध चांगले ठेवायचे आहेत. चीनशी चांगले संबंध असले तरी भारताशी संबंध बिघडू न देण्याचं राजपक्षे यांचे धोरण आहे. भारत हा एक मोठा शेजारी देश आहे आणि येत्या काळात भारताशी शत्रुत्व त्यांना महागात पडू शकते. इतकेच नव्हे तर श्रीलंकेतील सिंहला आणि तमीळ समुदायाच्या लोकांनाही भारताशी त्यांचे संबंध बिघडू नये, अशी इच्छा आहे. राजपक्षे यांनी चीनला श्रीलंकेत लष्करी कारवाया करू देऊ नयेत, अशी भारताची इच्छा आहे.

दुसरीकडे परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ डॉ. रहिस सिंह म्हणतात, "राजपक्षे हे त्यांच्या शेवटच्या कार्यकाळात चीन समर्थक राहिले. त्यांनी श्रीलंकेचे चीनच्या उपनगरीत रूपांतर केले. राजपक्षे यांच्या मते आणि धोरणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तेच धोरण पुढेही सुरू ठेवू इच्छित आहेत. दुसरीकडे चीन आपल्यावर सतत हल्ला करत आहे. एकीकडे त्याला लडाखमधील जमीन ताब्यात घ्यायची आहे, तर ड्रॅगनच्या भारताच्या शेजारी देश नेपाळ, बांगलादेशातही कुरबुरी सुरू आहेत. नेपाळही भारताला डोळे दाखवायला लागला आहे. पाकिस्तान त्याच्या बाजूने आहे, बांगलादेश आणि चीनमधील मैत्री वाढत आहे.
राजपक्षे यांच्या विजयानंतर आता पुन्हा एकदा चीनने आपल्या रणनीतीमध्ये यश मिळवले आहे. श्रीलंकेमध्ये 10 वर्षांत पुन्हा एकदा चीननं मजबूत पाया रचला आहे. एक प्रकारे चीन भारताच्या विरोधात दुहेरी भिंत बनवत चालला आहे. डॉ. सिंग यांनी सुचवले आहे की, आता भारताची धोरणे बदलताना आक्रमकतेने काम करावे लागेल. 

हंबनटोटा बंदर 99 वर्षं चीनला दिले
आपल्या आधीच्या कार्यकाळात राजपक्षे यांनी चीनबरोबर अनेक करार केले होते, ज्यामुळे भारत आणि पाश्चात्य देशांचा ताण वाढला होता. 2017मध्ये राजपक्षे यांनी कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यावर रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे हंबनटोटा बंदर चीनला 99 वर्षांसाठी चीनला दिले. हे बंदर भारताच्या अगदी जवळ आहे. राजपक्षे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्यांनी तमीळ बंडखोरांवर निर्दयीपणे अत्याचार केल्याची चर्चा आहे. 

Web Title: pro china mahinda rajapaksa gets majority in sri lanka election know what will be impact on india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.