शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:41 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला होता. या कारवाईत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यात शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले होते...

ऑपरेशन सिंदूरमधील पराभवानंतरही पाकिस्तान सुधारण्याचे नाव नाही. आता पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही (१४ ऑगस्ट) पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खूप बढाया मारल्या आहेत. चार दिवसांच्या संघर्षात पाकिस्तानने ऐतिहासिक विजय नोंदवला, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पाकिस्तानी जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात, "पाकिस्तानच्या स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी देशाला मनापासून शुभेच्छा देतो," असे शरीफ यांनी म्हटले आहे. 

शाहबाज यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, "मी राष्ट्रपिता मोहम्मद अली जिना आणि अल्लामा मोहम्मद इक्बाल यांना श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेते आणि कार्यकर्त्यांसह देशाला एका ध्येयासाठी एकत्रित केले. त्यांच्या प्रयत्नाने एका स्वतंत्र देशाच्या निर्मितीसह इतिहासाचा प्रवाह बदलला आणि अशक्य वाटणारे स्वप्न साकार केले." 

भारतासोबतच्या संघर्षासंदर्भात काय म्हणाले शाहबाज?  ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या संघर्षासाठी शाहबाज यांनी पूर्णपणे भारतालाच जबाबदार धरले आहे. बढाया मारताना ते म्हणाले, "भारताने आपल्यावर युद्ध लादले होते. मात्र पाकिस्तानने त्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयाने केवळ आपल्या स्वातंत्र्याचे पावित्र्यच बळकट केले नाही, तर आपल्या लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावनाही जागृत केली आहे. यामुळे या स्वातंत्र्यदिनाचा अभिमान आणि उत्साह आणखी वाढला आहे."

शाहबाज पुढे म्हणाले, "अल्लाहच्या कृपेने, आपल्या शूर सैनिकांनी आपली शान कायम ठेवली आणि शत्रूचा खोटा अभिमान मोडून काढला. आमच्या शूर सैनिकांनी आणि हवाई दलाच्या सैनिकांनी शत्रूला गुडघे टेकण्यास भाग पाडले. आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राण देणाऱ्या शहीदांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो."

ऑपरेशन सिंदूर दरम्यान झाला होता पाकिस्तानचा पराभव -पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला होता. या कारवाईत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यात शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले होते. यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. यानतंर, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लष्करी अड्ड्यांवर हल्ले करत प्रत्युत्तरही दिले होते.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतindian air forceभारतीय हवाई दलIndependence Dayस्वातंत्र्य दिन