शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:41 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला होता. या कारवाईत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यात शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले होते...

ऑपरेशन सिंदूरमधील पराभवानंतरही पाकिस्तान सुधारण्याचे नाव नाही. आता पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही (१४ ऑगस्ट) पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खूप बढाया मारल्या आहेत. चार दिवसांच्या संघर्षात पाकिस्तानने ऐतिहासिक विजय नोंदवला, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पाकिस्तानी जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात, "पाकिस्तानच्या स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी देशाला मनापासून शुभेच्छा देतो," असे शरीफ यांनी म्हटले आहे. 

शाहबाज यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, "मी राष्ट्रपिता मोहम्मद अली जिना आणि अल्लामा मोहम्मद इक्बाल यांना श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेते आणि कार्यकर्त्यांसह देशाला एका ध्येयासाठी एकत्रित केले. त्यांच्या प्रयत्नाने एका स्वतंत्र देशाच्या निर्मितीसह इतिहासाचा प्रवाह बदलला आणि अशक्य वाटणारे स्वप्न साकार केले." 

भारतासोबतच्या संघर्षासंदर्भात काय म्हणाले शाहबाज?  ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या संघर्षासाठी शाहबाज यांनी पूर्णपणे भारतालाच जबाबदार धरले आहे. बढाया मारताना ते म्हणाले, "भारताने आपल्यावर युद्ध लादले होते. मात्र पाकिस्तानने त्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयाने केवळ आपल्या स्वातंत्र्याचे पावित्र्यच बळकट केले नाही, तर आपल्या लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावनाही जागृत केली आहे. यामुळे या स्वातंत्र्यदिनाचा अभिमान आणि उत्साह आणखी वाढला आहे."

शाहबाज पुढे म्हणाले, "अल्लाहच्या कृपेने, आपल्या शूर सैनिकांनी आपली शान कायम ठेवली आणि शत्रूचा खोटा अभिमान मोडून काढला. आमच्या शूर सैनिकांनी आणि हवाई दलाच्या सैनिकांनी शत्रूला गुडघे टेकण्यास भाग पाडले. आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राण देणाऱ्या शहीदांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो."

ऑपरेशन सिंदूर दरम्यान झाला होता पाकिस्तानचा पराभव -पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला होता. या कारवाईत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यात शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले होते. यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. यानतंर, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लष्करी अड्ड्यांवर हल्ले करत प्रत्युत्तरही दिले होते.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतindian air forceभारतीय हवाई दलIndependence Dayस्वातंत्र्य दिन