शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

मेजावांना जायचंय चंद्रावर, पृथ्वीच्या खाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 1:22 PM

अंतराळात जाण्याचं भाग्य फारच थोड्या भाग्यवंतांना मिळतं. पूर्वी ते फक्त संशोधक, अभ्यासक आणि शास्त्रज्ञांनाच मिळत होतं.

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा १९८४ मध्ये पहिल्यांदा अंतराळात गेले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचा अंतराळातून संवाद झाला होता. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा यांना विचारले होते, अंतराळातून तुम्हाला आपला भारत देश कसा दिसतो आहे?  पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राकेश शर्मा यांनी दिलेलं उत्तर आजही भारतवासीयांच्या स्मरणात आहे. राकेश शर्मा यांचे त्यावेळचे उद्गार होते, ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा !...’

अंतराळात जाण्याचं भाग्य फारच थोड्या भाग्यवंतांना मिळतं. पूर्वी ते फक्त संशोधक, अभ्यासक आणि शास्त्रज्ञांनाच मिळत होतं. आज करोडपती ‘सर्वसामान्य’ लोकही अंतराळात जाऊ लागले आहेत. त्यातलंच एक नाव आहे. युसाकु मेजावा. जपानमधील ते एक अब्जाधीश उद्योगपती आहेत. नुकतेच ते बारा दिवसांचा अंतराळ दौरा करून परत पृथ्वीवर आले. अंतराळातून परतल्यावर लगेच त्यांनी सोशल मीडियावर तेथील आपल्या अनुभवांच्या पोस्ट्स, फोटो आणि व्हिडिओही  शेअर केले आहेत. आपल्या रोमांचक अनुभवाची कहाणी सांगताना त्यांनी अंतराळ प्रवासाचे नुसते किस्सेच  सांगितले नाहीत, तर अंतराळात असताना ब्रशने आपले दात कसे घासायचे, चहा कसा करायचा, यासंदर्भातलंही वर्णन केलं.

२०२३ मध्ये मेजावा यांना चंद्रावरही जायचं आहे. जे संशोधक, अंतराळ अभ्यासक नाहीत, अशाही अनेकांना आज अंतराळात जाण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी अनेक कंपन्यांनीही पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मदतीनं काही जण अंतराळातही पर्यटन करून आले आहेत. या कंपन्यांमध्ये प्रमुख नावे आहेत, ती म्हणजे एलन मस्क यांची ‘स्पेस एक्स’ ही कंपनी, जेफ बेझोस यांची ‘ब्लू ओरिजिन’ ही कंपनी, याशिवाय ‘व्हर्जिन अटलांटिक’, ‘एक्ससीओआर एरोस्पेस’, ‘आर्माडिलो एरोस्पेस अशा अनेक कंपन्या आता लोकांना अंतराळ पर्यटनाला घेऊन जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

‘स्पेस ॲडव्हेन्चर्स’ ही कंपनी तर पर्यटकांना अंतराळातही थरारक अनुभव मिळवून देणार आहे. मेजावा यांनी एलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ या कंपनीशी कधीचाच करार केला असून,  मस्क यांच्यासोबत २०२३ मध्ये ते चंद्रसफारीही  करणार आहेत.  ही सफारी केल्यानंतर चंद्रावर जाणारे ते पहिले ‘सर्वसामान्य’ व्यक्ती असतील. हा ‘इतिहास’ रचण्यासाठी ते उत्सुक आहेत. 

राकेश शर्मा यांनी अंतराळातून दिसणाऱ्या भारताचं जसं वर्णन केलं होतं, साधारण तसंच वर्णन मेजावा यांनीही पृथ्वीबाबत केलं आहे. मेजावा म्हणतात, जेव्हा तुम्ही अंतराळात जाता, तेव्हा तुम्हाला पृथ्वीची महत्ता कळते. या अंतराळ यात्रेने पृथ्वीबद्दल मला अधिक कृतज्ञ केले आहे. पृथ्वीप्रमाणेच अंतराळातही हवा आहे, वास आहे आणि अनेक ऋतूही आहेत याबद्दल आपण निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. अंतराळातही नंतर मानवी वस्ती वाढेल, याविषयी मी आशावादी आहे.

मेजावा पुढे सांगतात, शून्य गुरुत्वाकर्षणात चहा बनवणं, स्वच्छ कपड्यांची कमतरता यासारखी आव्हानं होती, पण एकूणच तो अनुभव अतिशय शानदार होता. अंतराळात शिरतानाचा अनुभव तर इतका रोमांचक होता, की मला जणू काही वाटलं, ‘शिन्कासेन’ (जपानी बुलेट ट्रेन) स्टेशनवरून सुटली आहे. सगळं काही इतकं सुरळीत आणि शांतपणे झालं की, काही कळलंही नाही. जेव्हा मी खिडकीतून बाहेर पाहिलं, तेव्हा लक्षात आलं, पृथ्वीची जी छायाचित्रे आपण पाहतो, त्यापेक्षा पृथ्वी शंभर पटींनी जास्त सुंदर आहे.

अंतराळातला अनुभव अतिशय छान असला, तरी शून्य गुरुत्वाकर्षणातून बाहेर येणं, सर्वसामान्य आयुष्यात परत येणं या गोष्टी अजून तरी तितक्याशा सोप्या नाहीत. मी पहिल्यांदा त्यातून बाहेर पडू इच्छितो.अंतराळात काही छोट्या मोठ्या आव्हानांचाही सामना करावा लागतो. एकतर अंतराळात झोप घेणं, झोप येणं ही गोष्ट सोपी नाही. झोप येण्यासाठी आपल्या सतत संघर्ष करावा लागतो. आपलं शरीर धरून ठेवण्यासाठी येथे काहीही नाही. माझ्या मनात आणखीही काही गोष्टींमुळे हिंदोळे सुरू आहेत. त्यातील सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे २०२३ मध्ये चंद्रभेटीसाठी मी अतिशय उत्सुक आहे.