शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पाकिस्तान नरमला, भारताकडे विनवणी; प्रादेशिक सुरक्षेचा हवाला देत केली सर्वात मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:09 IST

सीमेपलीकडून घुसखोरी अथवा दहशतवादी कृत्यांना खतपाणी द्यायचे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे.

इस्लामाबाद - मध्य पूर्वेतील वाढता तणावात पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी भारताकडे विनवणी केली आहे. संघर्ष आणि सैन्य कारवाईपासून दूर होऊन प्रादेशिक सुरक्षेसाठी चर्चा करण्याच्या दिशेने पाऊल टाकणे हा एकमेव मार्ग आहे असं त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानातील संसदेला संबोधित करताना झरदारी यांनी हे विधान केले. झरदारी यांच्या भाषणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मागील वर्षी काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढून या दोन्ही देशांमधील अविश्वास आणखी वाढला. पाकिस्तानसोबत कुठल्याही नात्यावर भारताने स्पष्ट भूमिका घेतली आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. प्रत्येकवेळी हल्ल्यानंतर शांततेचे आवाहन करायचे आणि त्यानंतर सीमेपलीकडून घुसखोरी अथवा दहशतवादी कृत्यांना खतपाणी द्यायचे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. पाकच्या या सवयीचा भारत कायम विरोध करत आला आहे.

खेळाच्या मैदानावरही मैत्री नाही...

इतकेच नाही तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नात्यात कटुता केवळ युद्धाच्या मैदानावर मर्यादित नाही तर त्याचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावरही जाणवतात. या दोन्ही देशात स्पर्धा समोरासमोर असो वा आंतरराष्ट्रीय टूर्नामेंट असेल, खेळाडूंच्या देहबोलीवरून प्रेक्षकांच्या घोषणाबाजीपर्यंत प्रत्येक ठिकाणी तणाव दिसतो. आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवला नाही आणि वर्ल्ड कपमध्येही पाक खेळाडूंनी भारतात येण्यास नकार दिला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नाते किती खराब आहे हे यावरून स्पष्ट दिसते.

झरदारी यांच्या विधानाच्या टायमिंगवर प्रश्न

झरदारी यांचं विधान राजनैतिकदृष्ट्या असले तरी त्याच्या टायमिंगवर अनेक प्रश्नचिन्ह आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर इतक्या दिवसांनीही भारतातील जनतेच्या भावना तीव्र आहेत. सुरक्षा यंत्रणा सीमापार दहशतवादी नेटवर्कच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. जर पाकिस्तानला खरोखरच चर्चा हवी असेल तर त्याने त्याच्या भूमीवर वाढणाऱ्या दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध ठोस आणि अचूक कारवाई केली पाहिजे असं भारताने यापूर्वी असे म्हटले आहे. त्याशिवाय झरदारी यांच्या विधानाचा आणखी एक पैलू आहे.

पाकिस्तानला अनेक आघाड्यांनी घेरले

झरदारी यांचे विधान आणखी एका दृष्टीने पाहिले जाते. ज्यात पाकिस्तान सध्या अनेक मोर्च्यावर युद्ध करत आहे. एकीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू आहे. दुसरीकडे बलूच बंडखोरही पाकिस्तानी सैन्याला टार्गेट करत आहेत. त्यात इराण युद्धाने पाकिस्तानची चिंता वाढवली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर हुसैन नेतान यांनी जो दावा केला आहे त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. अमेरिकेने इराणवरील हल्ल्यासाठी पाकिस्तानी एअरबेसचा वापर केला असा दावा त्यांनी केला. त्याशिवाय हा दावा जर खरा सिद्ध झाला तर पाकिस्तानला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशाराही इराणी कमांडरने दिला आहे. या स्थितीत भारताला चर्चेसाठी विनवणी करणे पाकिस्तानची मजबुरी झाली आहे. एकाच वेळी इतक्या आघाड्यांवर लढण्याची पाकिस्तानची क्षमता नाही हे यातून स्पष्ट होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Seeks Dialogue with India Amid Regional Security Concerns.

Web Summary : Amid rising tensions, Pakistan's President Zardari urged India to negotiate for regional security. India insists terror and talks can't coexist, citing Pakistan's history of supporting terrorism. Pakistan faces multiple conflicts, making dialogue a necessity.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानIranइराण