अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:21 IST2025-06-25T10:08:01+5:302025-06-25T10:21:48+5:30
पाकिस्तानमध्ये भारतीय कॅप्टन अभिनंदन यांना पकडणारा मोईज अब्बास दक्षिण वझिरिस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या प्राणघातक हल्ल्यात मारला गेला आहे.

अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत असल्याचा आरोप जगभरातून होत आहेत. पण, आता पाकिस्तान स्वत:लाही या दहशतवाद्यांपासून वाचवू शकत नाही. दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्येही दहशत पसरवली आहे. मंगळवारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने दक्षिण वझिरिस्तानच्या दोन भागात - सरगोधा आणि कुर्रम - पाकिस्तानी सैन्यावर हल्ले केले. यामध्ये, पाकिस्तानच्या सीमेवर भारतीय कॅप्टन अभिनंदन यांना पकडून त्यांचा छळ करणारे पाकिस्तानचे मेजर मोईज अब्बास यांचाही मृत्यू झाला.
भारतीय हवाई दलाचे कॅप्टन अभिनंदन यांना पाकिस्तान सीमेवर पकडणारे पाकिस्तानी ऑफिसर मेजर सैयद मोइज अब्बास शाह याच्यासह १४ जवानांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय. पाकिस्तानी लष्कराने अजूनही या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. पण, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत काही सैनिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी केला हल्ला
पाकिस्तानला सीमावर्ती भागात अनेक दहशतवादी आणि अतिरेकी संघटनांशी लढावे लागत आहे. मंगळवारी दक्षिण वझिरिस्तानमधील सरगोधा आणि कुर्रम भागात दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि पाकिस्तानी सैन्यात चकमक झाली. या चकमकीत चौदा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. दहशतवादी संघटनेने त्यांच्यावर हल्ला केला होता आणि पाकिस्तानी सैनिकही बरे होऊ शकले नाहीत आणि मारले गेले. पाकिस्तानी प्रशासनाने मोईज अब्बासच्या मृत्यूची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. पाकिस्तानच्या अनेक समर्थक सोशल मीडिया अकाउंट्सनी पुष्टी केली आहे की सरगोधा येथे झालेल्या चकमकीत मेजर सय्यद मोईजसह एकूण ६ जण ठार झाले.
या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांची ओळख पटवली आहे. यामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या सिक्स कमांडो बटालियनमध्ये तैनात असलेले मेजर सय्यद मोईज अब्बास शाह यांचे नावही पुढे आले. तहरीक-ए-तालिबानने हल्ला केला तेव्हा मेजर सय्यद सरगोधा परिसरात शोध मोहिमेत होते. २०१९ मध्ये, भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर झालेल्या नाट्यमय हवाई चकमकीनंतर मेजर सय्यद मोईज अब्बास यांचे नाव तेव्हा चर्चेत आले होते. तेव्हा त्यांनी भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना पकडले असल्याचा दावा केला होता.